शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कपिल पाटील यांच्या स्वागताला शिवसेना, मनसेचेही नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST

कल्याण : केंद्रात आगरी समाजाच्या लोकप्रतिनिधीला प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने आगरी समाजात आनंदाची लाट उसळली असल्याची प्रचिती सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री ...

कल्याण : केंद्रात आगरी समाजाच्या लोकप्रतिनिधीला प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने आगरी समाजात आनंदाची लाट उसळली असल्याची प्रचिती सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने आली. ठिकठिकाणी राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून आगरी लोकप्रतिनिधींनी पाटील यांचे जोरदार स्वागत केले.

पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा ठाण्यातून सुरू होऊन शीळ फाट्यानजीक पोहचली तेव्हा शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पलावा सिटी येथे पोहोचताच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाटील यांचे स्वागत करीत त्यांच्या यात्रा रथावर ते काही काळ विराजमान झाले. काटई नाका येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पाटील यांचे स्वागत केले. ही यात्रा पुढे मानपाडा येथे आली असता मानपाडेश्वर मंदिरानजीक २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार व उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी पाटील यांचे स्वागत केले. टाटा नाका येथे माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. या ठिकाणी बंजारा समाजाच्या महिलांनी त्यांची आरती केली. पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन आगरी समाजाने पाटील यांचे स्वागत केले.

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. ते भेदण्यासाठी भाजपने पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले. दि. बा. पाटील विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न आणि २७ गावांच्या विलगीकरणाचा मुद्दा या भागातील कळीचे मुद्दे आहेत.

आजोबांना भेटली नातवंडे

पाटील यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने पदाची शपथ घेण्यापूर्वी एक दिवस आधी पाटील दिल्लीला रवाना झाले होते. स्वातंत्र्य दिनापर्यंत दिल्ली न सोडण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्याने त्यांना पुन्हा घरी येण्यास वेळ मिळाला नाही. यात्रेला येण्यासाठी ते दिल्लीहून मुंबई विमानतळावर आले तेव्हा पाटील यांच्या नातवंडांनी त्यांना कडकडून मिठी मारली. आजोबा, नातवंडांच्या चेहऱ्यावर माया, वात्सल्याचा आनंद झळकत होता.

------------------

वाचली