शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कपिल पाटील यांच्या स्वागताला शिवसेना, मनसेचेही नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST

कल्याण : केंद्रात आगरी समाजाच्या लोकप्रतिनिधीला प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने आगरी समाजात आनंदाची लाट उसळली असल्याची प्रचिती सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री ...

कल्याण : केंद्रात आगरी समाजाच्या लोकप्रतिनिधीला प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने आगरी समाजात आनंदाची लाट उसळली असल्याची प्रचिती सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने आली. ठिकठिकाणी राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून आगरी लोकप्रतिनिधींनी पाटील यांचे जोरदार स्वागत केले.

पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा ठाण्यातून सुरू होऊन शीळ फाट्यानजीक पोहचली तेव्हा शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पलावा सिटी येथे पोहोचताच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाटील यांचे स्वागत करीत त्यांच्या यात्रा रथावर ते काही काळ विराजमान झाले. काटई नाका येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पाटील यांचे स्वागत केले. ही यात्रा पुढे मानपाडा येथे आली असता मानपाडेश्वर मंदिरानजीक २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार व उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी पाटील यांचे स्वागत केले. टाटा नाका येथे माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. या ठिकाणी बंजारा समाजाच्या महिलांनी त्यांची आरती केली. पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन आगरी समाजाने पाटील यांचे स्वागत केले.

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. ते भेदण्यासाठी भाजपने पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले. दि. बा. पाटील विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न आणि २७ गावांच्या विलगीकरणाचा मुद्दा या भागातील कळीचे मुद्दे आहेत.

आजोबांना भेटली नातवंडे

पाटील यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने पदाची शपथ घेण्यापूर्वी एक दिवस आधी पाटील दिल्लीला रवाना झाले होते. स्वातंत्र्य दिनापर्यंत दिल्ली न सोडण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्याने त्यांना पुन्हा घरी येण्यास वेळ मिळाला नाही. यात्रेला येण्यासाठी ते दिल्लीहून मुंबई विमानतळावर आले तेव्हा पाटील यांच्या नातवंडांनी त्यांना कडकडून मिठी मारली. आजोबा, नातवंडांच्या चेहऱ्यावर माया, वात्सल्याचा आनंद झळकत होता.

------------------

वाचली