शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसैनिकाकडूनच तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्यांच्या ...

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्यांच्या आवाहनाला शिवसेनेच्या माजी नगरसेवकानेच तिलांजली दिल्याचे चित्र शनिवारी कल्याणमध्ये पाहायला मिळाले. ५० जणांच्याच उपस्थितीला परवानगी असताना माजी नगरसेवक सुनील वायले आणि माजी नगरसेविका शालिनी वायले यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला तोबा गर्दी झाली होती. या ठिकाणी दोन लग्नसोहळे होते. यात सोशल डिस्टन्स, मास्क लावणे या नियमांचेही उल्लंघन झाले. दरम्यान, याप्रकरणी वधुपिता वायले यांच्यासह अन्य लग्नसोहळ्यातील वधुपिता सुरेश म्हात्रे आणि भवानी मॅरेज हॉलचे व्यवस्थापक रमेश सिंग यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कल्याण-डोंबिवलीत दररोज हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत. मनपा क्षेत्रात त्यांना रुग्णालयात बेडही मिळणे मुश्कील बनले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन कोरोना नियमांचे पालन करा, असे नागरिकांना सांगत आहेत. मात्र नियम पाळले जात नसल्यामुळे दोन्ही शहरांमधील स्थिती भयावह हाेत आहे. नागरिकांसह आता नगरसेवकही नियमांना तिलांजली देत असून शनिवारच्या लग्नसोहळ्यातून हे समोर आले आहे. यातील एक लग्नसोहळा माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या मुलीचा होता. याप्रकरणी त्यांच्यासह तेथे पार पडलेल्या अन्य लग्नसोहळ्यातील वधुपिता सुरेश म्हात्रे आणि हॉलचे व्यवस्थापक रमेश सिंग अशा तिघांविरोधात आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

ना मास्क, ना साेशल डिस्टन्सिंग

मोकळ्या जागा, लॉन्स, विनावातानुकूलित हॉल या ठिकाणी ५० व्यक्तींनाच हजर राहता येईल, असा नियम असताना पश्चिमेतील काळा (भगवा) तलाव परिसरातील भवानी मॅरेज हॉलमध्ये एकत्रित पार पडलेल्या दोन लग्नसोहळ्यांना तब्बल ९०० ते १०००च्या आसपास पाहुण्यांनी उपस्थिती लावल्याचे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांना गस्तीदरम्यान आढळले. यात बहुतांश जणांनी मास्कही परिधान केले नव्हते की सोशल डिस्टन्सिंगही नव्हते.