शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

शिंदे- चव्हाण यांच्यात तू तू- मैं मैं

By admin | Updated: March 31, 2017 06:09 IST

महापौरपदाची निवडणूक शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली असून त्यावरूनच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात

उल्हासनगर : महापौरपदाची निवडणूक शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली असून त्यावरूनच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात शाब्दिक चकमक झाली.महापौर निवडणुकीकरिता अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा दिवस होता आणि सध्या शिंदे व चव्हाण हे शहरात ठाण मांडून बसले आहेत. साई पक्षाचे नगरसेवक शेरी व कांचन लुंड यांच्या घरी शिंदे यांची खलबते सुरू आहेत, तर नगरसेविका ज्योती चैनानी यांच्या घरी चव्हाण यांनी ठाण मांडले आहे. शिवसेनेने साई पक्षाच्या शेरी लुंड गटाला महापौरपदाची आॅफर देऊन भाजपासोबत गेलेल्या साई पक्षात फूट पाडण्याचे मनसुबे रचले होते. त्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती. भाजपा साई पक्षाच्या पाठिंब्याने ४० नगरसेवकांचा जादुई आकडा पार करू शकते. मात्र, शिवसेनेने साई पक्षाला सुरुंग लावला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना सोबत घेतले. काँग्रेस, पीआरपी व भारिपाच्या प्रत्येकी एक नगरसेवकाचा पाठिंबा मिळवण्यात शिवसेनेला यश आले, अशी चर्चा आहे. साई पक्षाच्या फुटीमुळे हातातोंडाशी आलेले महापौरपद जाईल, या भीतीने राज्यमंत्री चव्हाण यांनी लुंड गटाच्या नगरसेवकांना वाटाघाटी करण्याकरिता चैनानी यांच्या घरी बोलावले होते. शिंदे यांना याची कुणकुण लागताच ते आपला ताफा घेऊन थेट चैनानी यांच्या घरात घुसले. चव्हाण व लुंड गटाचे नगरसेवक यांना चर्चा करताना पाहून त्यांचा पारा चढला. त्यांनी चव्हाण यांना फैलावर घेतले. साई पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला असून त्यांच्या नगरसेवकांना तुम्ही ओलीस ठेवूनका, असे चव्हाण यांनी शिंदे यांना सुनावले, तर साई पक्ष कोणत्याही दडपणाखाली नाही, ते स्वत:हून महापौरपदाचा अर्ज दाखल करीत आहेत. मात्र, तुम्ही सत्तेचा गैरवापर करीत असल्याचे प्रत्युत्तर शिंदे यांनी चव्हाण यांना दिले. शिंदे यांना प्रारंभी चव्हाण यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे आक्रमक राहिल्याने चव्हाण यांचाही आवाज चढला. यामुळे शिवसेना व भाजपातील तणाव वाढला आहे. (प्रतिनिधी) शेरी लुंड व कांचन लुंड महापौरपदाचा अर्ज भरण्यासाठी येणार, असे शिवसेनेने गृहीत धरले होते. मात्र, ते चव्हाण यांच्यासोबत वाटाघाटी करीत बसल्याने येऊ शकले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी ज्योती माने यांचा महापौरपदासाठी, तर रिपाइंचे भगवान भालेराव यांचा उपमहापौरपदाकरिता अर्ज दाखल केला. भाजपाने महापौरपदासाठी मीना आयलानी यांचा, तर उपमहापौरपदासाठी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी अर्ज दाखल केला. चव्हाण यांच्या खेळीमुळे साई पक्षातील लुंड गटाचे नगरसेवक अर्ज भरण्यासाठी येऊ शकले नाहीत. मात्र, साई पक्षाच्या एका गटाला सोबत घेऊन महापौर शिवसेनेचाच होणार, असा दावा शिवसेना करीत असल्याने हा संघर्ष प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत तीव्र होणार आहे.भाजपात वाद उफाळण्याची शक्यता भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांची पत्नी मीना आयलानी यांना महापौरपद देऊ नका, असा सूर पक्षाच्या एका गटासह ओमी कलानी यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे लावला होता. मात्र, आयलानी यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतचे संबंध कामी आले आणि मीना आयलानी यांना उमेदवारी मिळाली. भाजपातील आयलानी विरोधी गट व ओमी कलानी गटात तूर्त स्मशानशांतता असली तरी ही नाराजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.