शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शीळ-कल्याण मार्गाचा मेकओव्हर!

By admin | Updated: October 4, 2016 02:27 IST

ठाणे ते शीळ मुंब्रा मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून आता वाहनचालकांची लवकरच सुटका होणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली ते मुंब्रा दरम्यान

ठाणे : ठाणे ते शीळ मुंब्रा मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून आता वाहनचालकांची लवकरच सुटका होणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली ते मुंब्रा दरम्यान पारसिकडोंगरातून भूयारी मार्ग आणि पुढे एलिव्हेटेड मार्गही एमएमआरडीने प्रस्तावित केला आहे. यासाठी सुमारे ३७४ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. तर शीळ फाटा जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शनपर्यंतच्या रस्त्याचेही रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यात येणार असून यासाठी ७८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण कामांच्या निविदा काढल्या असून २०१९ पर्यंत ती पूर्ण होतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. शिवाय याकामात अडथळा ठरणाऱ्या मुंब्रा बायपास रोडवरील वीजवाहिन्या बदलण्यासाठी आणि ट्रान्सफर्मा उभारण्यासाठी ८ कोटी ६७ लाखाची निविदा काढली आहे. एकूणच आता या भागासाठी तब्बल ४६० कोटींचे हे जम्बो काम येत्या काळात मार्गी लागणार आहे. ठाणे ते शीळ तसेच मुंब्रा मार्गावर होणारी वाहतूककोंडी तसेच नवी मुंबईकडून शीळ मार्गावरही वाहन चालकांना ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मार्गावर भुयारी मार्ग असावा, अशी मागणी आमदार सुभाष भोईर यांनी केली होती. दरम्यान, मुंब्रा-ऐरोली भुयारी मार्गातून पुढे बेलापूरपर्यंत जाता येणार आहे. या कामांचे एमएमआरडीएने नुकतेच टेंडरही प्रसिद्ध केले असून पुढील ४० महिन्यात २०१९ मध्ये काटई-मुंब्रा-ऐरोली असा हा रस्ता ठाणे-शीळ मुंब्रा या महाभयंकर वाहतूक कोंडीवर उतारा ठरणार आहे. तो चारपदरी असणार आहे. या रस्त्यांच्या मार्गात भारत गिअर कंपनी, वनखाते आणि थोडेफार नागरीकरण असे तिहेरी अडथळे होते. त्यापैकी वनखात्याच्या बाधीत जमिनी एवढी जमीन वनीकरणासाठी देण्याची मंजुरी मिळाल्यामुळे वनखात्याचा मोठा अडसर संपला आहे. तर भारत गिअर कंपनीची जमीन वर्ग करण्याची प्रक्रि या ठामपाने सुरू केली असून संयुक्तपणे एमआयडीसीच्या बाधीत जमीन आराखड्यावरदेखील शासनाच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आता ही प्रक्रि या केवळ निविदा उघडण्याच्या प्रतिक्षेत असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती भोईर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)