शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

शेलार ग्रामपंचायतीने केले सहा हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:42 IST

भिवंडी : तालुक्यातील शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने सहा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती सरपंच ॲड. किरण ...

भिवंडी : तालुक्यातील शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने सहा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती सरपंच ॲड. किरण चन्ने यांनी गुरुवारी दिली.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करण्याबरोबरच नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र लसीचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांना लस मिळत नाही. भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत स्वतः पुढाकाराने गावातील ६००६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे.

५१६९ नागरिकांना पहिला डोस, तर ८३७ नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ज्यात २० अपंग नागरिक, १८ गरोदर माता व ४४ स्तनदा मातांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेलार गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू केलेल्या प्रशस्त कोविड सेंटरमध्ये तीन वैद्यकीय अधिकारी, सहा नर्स, चार वाॅर्डबॉय व चार ऑनलाइन वर्कर अशा एकूण १३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केल्याची माहिती सरपंच चन्ने यांनी दिली.

शेलार ग्रामपंचायतीने सुरुवातीपासून कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले आहे. गावात सॅनिटायझर स्टॅण्ड, औषध फवारणी, स्वछता या सर्व बाबींची पूर्तता केलेली आहे. सध्या शेलार गावात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असल्याने शेलार कोविड सेंटरमध्ये तीन ठिकाणी लसीकरण सेंटर सुरू केले आहे. सेंटरच्या बाजूलाच असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातही लसीकरणाची सोय केली आहे. तसेच स्वतंत्र बैठक व्यवस्था, चहापाणी याची सुविधाही पंचायतीच्या वतीने केली असल्याची माहिती सरपंच्यांनी लोकमतला दिली.