शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एमआयडीसीतील सांडपाणी वाहिन्या जीर्णावस्थेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST

डोंबिवली : एमआयडीसीतील ३५ ते ५० वर्षांपूर्वीच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जीर्णावस्थेत आहेत. देखभाल व दुरुस्ती करण्यालायकही त्या राहिल्या ...

डोंबिवली : एमआयडीसीतील ३५ ते ५० वर्षांपूर्वीच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जीर्णावस्थेत आहेत. देखभाल व दुरुस्ती करण्यालायकही त्या राहिल्या नसल्याने सध्या ड्रेनेज चेंबर तुडुंब भरून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र येथील औद्योगिक आणि रहिवासी क्षेत्रांत पाहायला मिळत आहे.

प्रदूषणाची समस्या अधूनमधून डोके वर काढत असताना आता सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जीर्णावस्थेतील वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. १९६४ ला या ठिकाणी एमआयडीसी आल्यावर येथील उद्योगांसाठी रासायनिक व इतर सांडपाणी वाहून नेण्यासाठी ७०च्या दशकात सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली; तर निवासी भागात सांडपाणी वाहिन्या १९८५ ला टाकण्यात आल्या. वाहिन्यांची एकूण लांबी कमीत कमी अंदाजे ३१ कि.मी. आहे. १५० ते ८०० व्यासाच्या जाडीचे सिमेंट पाइप त्यावेळी टाकण्यात आले होते. कालांतराने विविध कारणांमुळे या वाहिन्या व त्यांवरील चेंबर नादुरुस्त होत गेले. सांडपाणी वाहिन्यांना आजच्या घडीला बऱ्याच वर्षांचा काळ लोटला आहे. त्याची देखभाल व दुरुस्तीही आता शक्य नाही. या वाहिन्यांना रस्तेदुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या टाकण्यासाठी तसेच अन्य प्राधिकरणांनी केबल टाकण्याकामी केलेल्या खोदकामांमुळे धक्के बसून त्या नादुरुस्त झाल्या आहेत. वृक्षांची खोलवर गेलेले खोड, मुळे वाहिन्यांमध्ये शिरून त्या खराब झाल्या आहेत. यात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या आणि त्यांचे चेंबर फुटलेले आढळून येत असून त्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

------------------------------------------------------

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे

सांडपाण्याच्या जीर्ण झालेल्या वाहिन्यांमुळे रासायनिक प्रदूषण, दुर्गंधी, आरोग्य, पर्यावरण, आदी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील प्रदूषण कमी झाल्याचे विविध प्रयोग आणि दावे केले जात आहेत. प्रत्यक्षात काहीही फरक पडलेला नाही. एमआयडीसीकडून जुन्या वाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकण्याचे प्राथमिक स्तरावर कागदावर नियोजन चालू आहे. या कामासाठी प्रस्ताव पाठविला तरी त्यानंतर मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळणे, निविदा काढणे, आदी कामांसाठी काही महिने जातील. त्यानंतर हे मोठे काम पूर्णत्वास येण्यास अजून काही वर्षे जातील. आरोग्य, प्रदूषण यांविषयी असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नांत हे काम लवकर कसे मार्गी लागेल यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे ही विनंती.

- राजू नलावडे, रहिवासी, एमआयडीसी निवासी विभाग

------------------------------------------------------

फोटो आहे