शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

नांदिवलीत १४ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : गेल्या १४ दिवसांपासून नांदिवली भागातील काही इमारतींमध्ये पाणीटंचाई भेडसावत असून, नागरिक हैराण झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : गेल्या १४ दिवसांपासून नांदिवली भागातील काही इमारतींमध्ये पाणीटंचाई भेडसावत असून, नागरिक हैराण झाले आहेत. टँकरवर किती दिवस पैसे खर्च करायचे, असा सवाल त्यांनी केला आहे. जोपर्यंत पुरेसे पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणी बिल मागू नये, असा पवित्रा रहिवाशांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, नांदिवली टेकडी परिसरातील शांताराम दर्शन, श्री संकल्प, अंबर तीर्थ सोसायटी, यशश्री अपार्टमेंट, महाकाली आर्केड आदी ठिकाणी पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत. यापैकी काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी रहिवाशांना पैसे खर्च करावे लागत आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे या रहिवाशांनी आपली व्यथा मांडली आहे. गेल्या १४ दिवसांपासून नांदिवली टेकडी परिसरात पाणी नाही. तेथे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो; परंतु केडीएमसीला आम्ही पाणीपट्टी भरतो, असे एका महिलेने सांगितले. गेल्या चौदा दिवसांपासून दररोज २०० रुपये भरून टँकर येत असून, हे किती दिवस चालणार, असा सवाल तिने केला. ज्या सोसायटीचे पाण्याचे बिल बाकी आहे अशा सोसायट्यांची पाइपलाइन येत्या २० मार्चपासून तोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. हे खरे आहे का, असा सवाल महिलेने केला. जर पाणी येत नसेल तर बिल कसले भरायचे, असेही ती म्हणाली.

............

* सांगाव, सांगर्ली, भोपर, दावडी, तसेच नांदिवलीत काही ठिकाणी पाणी समस्या भेडसावत आहे. त्यामुळे त्याबाबत सातत्याने आम्ही महापालिका, एमआयडीसीकडे पाठपुरावा करीत आहोत. बहुतांश ठिकाणी जलवाहिन्या जुन्या झाल्याने नवीन टाकण्याचे काम सुरू आहे. पाण्याचा दाब वाढविल्यास जुन्या जलवाहिन्या फुटण्याची शक्यता असल्याचे कारण सांगण्यात येते. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे असा प्रयत्न सुरू आहे.

- प्रकाश म्हात्रे, नेते, शिवसेना

--------