शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

नांदिवलीत १४ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : गेल्या १४ दिवसांपासून नांदिवली भागातील काही इमारतींमध्ये पाणीटंचाई भेडसावत असून, नागरिक हैराण झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : गेल्या १४ दिवसांपासून नांदिवली भागातील काही इमारतींमध्ये पाणीटंचाई भेडसावत असून, नागरिक हैराण झाले आहेत. टँकरवर किती दिवस पैसे खर्च करायचे, असा सवाल त्यांनी केला आहे. जोपर्यंत पुरेसे पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणी बिल मागू नये, असा पवित्रा रहिवाशांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, नांदिवली टेकडी परिसरातील शांताराम दर्शन, श्री संकल्प, अंबर तीर्थ सोसायटी, यशश्री अपार्टमेंट, महाकाली आर्केड आदी ठिकाणी पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत. यापैकी काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी रहिवाशांना पैसे खर्च करावे लागत आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे या रहिवाशांनी आपली व्यथा मांडली आहे. गेल्या १४ दिवसांपासून नांदिवली टेकडी परिसरात पाणी नाही. तेथे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो; परंतु केडीएमसीला आम्ही पाणीपट्टी भरतो, असे एका महिलेने सांगितले. गेल्या चौदा दिवसांपासून दररोज २०० रुपये भरून टँकर येत असून, हे किती दिवस चालणार, असा सवाल तिने केला. ज्या सोसायटीचे पाण्याचे बिल बाकी आहे अशा सोसायट्यांची पाइपलाइन येत्या २० मार्चपासून तोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. हे खरे आहे का, असा सवाल महिलेने केला. जर पाणी येत नसेल तर बिल कसले भरायचे, असेही ती म्हणाली.

............

* सांगाव, सांगर्ली, भोपर, दावडी, तसेच नांदिवलीत काही ठिकाणी पाणी समस्या भेडसावत आहे. त्यामुळे त्याबाबत सातत्याने आम्ही महापालिका, एमआयडीसीकडे पाठपुरावा करीत आहोत. बहुतांश ठिकाणी जलवाहिन्या जुन्या झाल्याने नवीन टाकण्याचे काम सुरू आहे. पाण्याचा दाब वाढविल्यास जुन्या जलवाहिन्या फुटण्याची शक्यता असल्याचे कारण सांगण्यात येते. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे असा प्रयत्न सुरू आहे.

- प्रकाश म्हात्रे, नेते, शिवसेना

--------