शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

सेनेला सत्तेचा लोभ!

By admin | Updated: February 13, 2017 05:06 IST

निवडणुकांच्या निमित्ताने भाजप-सेनेत रंगलेल्या संघर्षाचे विश्लेषण राज्यातील जनता करते आहे. दोन्ही पक्ष एकत्र सत्ता हाती ठेवतात

ठाणे : निवडणुकांच्या निमित्ताने भाजप-सेनेत रंगलेल्या संघर्षाचे विश्लेषण राज्यातील जनता करते आहे. दोन्ही पक्ष एकत्र सत्ता हाती ठेवतात आणि व्यासपीठावरून परस्परांची लक्तरे काढतात. मुख्यमंत्र्यांना खुर्चीची भीती आहे; तर शिवसेनेचा सत्तेचा लोभ सुटत नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.ठाण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी कळवा-खारेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत त्यांनी भाजप-सेनेवर तोंडसुख घेतले. निवडणुकीनिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे खरे रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडल्याबद्दल पवार यांनी उपरोधिक भाषेत त्यांचे आभार मानले. शिवसेनेवर गुन्हेगारीचे आरोप करणारे मुख्यमंत्री गृहखाते आपल्याकडेच आहे, हे विसरतात. गृहमंत्री या नात्याने या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मात्र खुर्चीची भीती असल्याने मुख्यमंत्री ते करणार नाहीत, असा आरोप पवार यांनी केला. भाजपच्या उमेदवारांना निवडून दिल्यास विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देत आहेत. याचा अर्थ लोकांनी भाजपला मतदान न केल्यास मुख्यमंत्री विकास करणार नाहीत असा तर नाही ना, असा चिमटाही त्यांनी काढला. आधी मालमत्ता कर वाढवायचा आणि मग मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन वचननाम्यातून देणाऱ्या शिवसेनेवर पवार यांनी दुटप्पीपणाचा आरोप केला. बलात्कार आणि खुनासारखे गंभीर आरोप असलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार ठाणेकरांवर लादणाऱ्या शिवसेनेचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. या पक्षाच्या कारभारामुळे ठाण्यातील पाण्याचे नियोजन फसले आहे. एकेकाळी अभ्यासू लोकांनी नेतृत्व केलेल्या ठाणे महापालिकेची अवस्था शिवसेनेने बकाल केली. गेल्या २0 वर्षांमध्ये एकही मोठा प्रकल्प शिवसेना पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखे बाजुला करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी पवार यांनी ठाणे महापालिकेची तुलना नवी मुंबईशी केली. नवी मुंबई महापालिकेने तेथील रहिवाशांवर कोणतीही करवाढ लादली नाही. नवी मुंबई महापालिकेच्या शहर बससेवेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७५ टक्के प्रवास सवलत दिली जाते. ठाणे महापालिका मात्र जुनी असूनही केवळ ५0 टक्केच सवलत देते. ठाणे महापालिकेने लोकांवर अलिकडेच करवाढ लादली. आता निवडणुकीत लोकांसमोर जायला तोंड नसल्याने शिवसेनेने मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन वचननाम्याच्या माध्यमातून दिले असल्याचा आरोप पवार यांनी केला. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा समाचारही पवार यांनी यावेळी घेतला. नोटाबंदीने असंख्य सामान्यांचे संसार उद््ध्वस्त केले. मालेगाव, भिवंडीतील हजारो कामगार घरी बसल्याचा आरोप त्यांनी केला. सभेच्या सुरूवातीला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना पक्षाच्या विकासकामांचा आढावा घेतला. कळवा परिसरातील अनेक महत्वपूर्ण प्रकल्प केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मार्गी लागले असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे नेते गणेश नाईक यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते वसंत डावखरे, आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, मनोहर साळवी यांच्यासह इतर नेते आणि महापालिका निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)