शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

जप्त मालमत्तेचा होणार लिलाव

By admin | Updated: October 12, 2016 04:33 IST

महापालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान पेलतानाच निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरात विकासाची काही कामे सुरू व्हावीत म्हणून

उल्हासनगर : महापालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान पेलतानाच निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरात विकासाची काही कामे सुरू व्हावीत म्हणून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कंबर कसली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावातून उत्पन्न मिळवणे आणि साधारण २५० कोटींची भकबाकी वसूल करून प्रकल्पांसाठी पैसे उभे करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. कामगारांना शिस्त लागावी म्हणून बायोमेट्रिक हजेरी सुरू होईल. त्यासाठी मास्टर कार्ड बनविण्यात आले आहे. त्या आधारेच पगार काढला जाईल. शिवाय कर्मचाऱ्यांनी टंगळमंगळ करू नये, अकारण भेटीगाठी सुरू राहू नयेत, यासाठी सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे. उल्हासनगर महापालिकेचे मालमत्ता-पाणी करपट्टी आणि एलबीटी हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. मालमत्ता व पाणी करातून सरासरी १००, तर एलबीटीच्या अनुदानापोटी सरकारकडून १५० कोटीचे उत्पन्न मिळते. मात्र मालमत्ता व पाणीपट्टीची थकबाकी २५० कोटीवर गेली आहे. त्यामुळे उत्पन्न-खर्चाची तोंडमिळवणी कठीण झाल्याने शहर विकासाची कामे ठप्प असून सावळागोंधळ निर्माण झाला आहे. मालमत्ता थकबाकीधारकांविरोधात पालिकेने कठोर पावले उचलून ३५ पेक्षा जास्त मालमत्ता आधीच सील केल्या आहेत. पालिकेने एकाच वर्षात दोन वेळा अभय योजना राबविली. त्यातून पालिकेला ५२ कोटीचे उत्पन्न मिळाले. तरीही २५० कोटींपेक्षा जास्त थकबाकी वसुली शिल्लक आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर विभागाने पाच लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ८० धारकांना नोटीसा पाठवली होती. इतर थकबाकीदार मालमत्ताधारकांची यादी प्रभाग समितीनिहाय बनवली होती. त्यातील ३५ मालमत्ता जप्त केल्या. तर इतरांवर कारवाई सुरू असतानाच राजकीय हस्तक्षेप झाल्याने कारवाई बंद पडली. ती नव्या आयुक्तांनी हाती घेतली असून जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून त्यातूनही उत्पन्न मिळवले जाणार आहे. (प्रतिनिधी)सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे महापालिकेचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. सर्व कॅमेऱ्यांची जोडणी आयुक्तांच्या कार्यालयात राहणार आहेत. गैरप्रकार, सावळागोंधळ, अनावश्यक व्यक्तींचा असलेला वावर यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. अधिकाऱ्यांसह कामगार वेळेत कामावर येतात की नाही? ते काम करतात की वेळकाढूपणा हेही पाहिले जाणार आहे. कामगारांसाठी मास्टर कार्ड-च्कामगारांचा पगार यापुढे बायोमेट्रिक हजेरीवर काढला जाईल. तसेच प्रत्येकाला मास्टर कार्ड दिले जाईल. लेटलतिफ कामगार व अधिकाऱ्यांवर त्यातून नियंत्रण ठेवले जाईल. च्प्रत्येकाचे मास्टर कार्ड बनविण्यात येत असून त्यात त्यांची इत्यंभूत माहिती राहणार आहे. त्यांची सेवा, पदभार, विभागाची माहिती, कामाची पध्दत, तसेच अधिकाऱ्यांची टिप्पणी-शेरे आदींचा समावेश या मास्टर कार्डमध्ये असेल.५० हजार मालमत्ता कराविनाच्शहरात सुमारे ५० हजार मालमत्ता कराविना आहेत. पालिकेच्या सुविधा त्यांना मिळतात, पण कराची आकारणी-वसुली होत नाही. त्यांनी स्वत:हून मालमत्तेची माहिती द्यावी. नाममात्र दंड आकारून ही मालमत्ता नियमित केली जाईल, अशी योजना पालिका आणणार आहे. च्त्या काळात मालमत्ता जाहीर न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. चुकीचा किंवा कमी मालमत्ता कर लावलेल्यांनीही मालमत्ता विभागाशी संपर्क साधावा. अन्यथा नंतर कारवाई केली जाईल, असे आवाहनही पालिकेने केले आहे.