शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

जप्त मालमत्तेचा होणार लिलाव

By admin | Updated: October 12, 2016 04:33 IST

महापालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान पेलतानाच निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरात विकासाची काही कामे सुरू व्हावीत म्हणून

उल्हासनगर : महापालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान पेलतानाच निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरात विकासाची काही कामे सुरू व्हावीत म्हणून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कंबर कसली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावातून उत्पन्न मिळवणे आणि साधारण २५० कोटींची भकबाकी वसूल करून प्रकल्पांसाठी पैसे उभे करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. कामगारांना शिस्त लागावी म्हणून बायोमेट्रिक हजेरी सुरू होईल. त्यासाठी मास्टर कार्ड बनविण्यात आले आहे. त्या आधारेच पगार काढला जाईल. शिवाय कर्मचाऱ्यांनी टंगळमंगळ करू नये, अकारण भेटीगाठी सुरू राहू नयेत, यासाठी सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे. उल्हासनगर महापालिकेचे मालमत्ता-पाणी करपट्टी आणि एलबीटी हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. मालमत्ता व पाणी करातून सरासरी १००, तर एलबीटीच्या अनुदानापोटी सरकारकडून १५० कोटीचे उत्पन्न मिळते. मात्र मालमत्ता व पाणीपट्टीची थकबाकी २५० कोटीवर गेली आहे. त्यामुळे उत्पन्न-खर्चाची तोंडमिळवणी कठीण झाल्याने शहर विकासाची कामे ठप्प असून सावळागोंधळ निर्माण झाला आहे. मालमत्ता थकबाकीधारकांविरोधात पालिकेने कठोर पावले उचलून ३५ पेक्षा जास्त मालमत्ता आधीच सील केल्या आहेत. पालिकेने एकाच वर्षात दोन वेळा अभय योजना राबविली. त्यातून पालिकेला ५२ कोटीचे उत्पन्न मिळाले. तरीही २५० कोटींपेक्षा जास्त थकबाकी वसुली शिल्लक आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर विभागाने पाच लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ८० धारकांना नोटीसा पाठवली होती. इतर थकबाकीदार मालमत्ताधारकांची यादी प्रभाग समितीनिहाय बनवली होती. त्यातील ३५ मालमत्ता जप्त केल्या. तर इतरांवर कारवाई सुरू असतानाच राजकीय हस्तक्षेप झाल्याने कारवाई बंद पडली. ती नव्या आयुक्तांनी हाती घेतली असून जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून त्यातूनही उत्पन्न मिळवले जाणार आहे. (प्रतिनिधी)सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे महापालिकेचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. सर्व कॅमेऱ्यांची जोडणी आयुक्तांच्या कार्यालयात राहणार आहेत. गैरप्रकार, सावळागोंधळ, अनावश्यक व्यक्तींचा असलेला वावर यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. अधिकाऱ्यांसह कामगार वेळेत कामावर येतात की नाही? ते काम करतात की वेळकाढूपणा हेही पाहिले जाणार आहे. कामगारांसाठी मास्टर कार्ड-च्कामगारांचा पगार यापुढे बायोमेट्रिक हजेरीवर काढला जाईल. तसेच प्रत्येकाला मास्टर कार्ड दिले जाईल. लेटलतिफ कामगार व अधिकाऱ्यांवर त्यातून नियंत्रण ठेवले जाईल. च्प्रत्येकाचे मास्टर कार्ड बनविण्यात येत असून त्यात त्यांची इत्यंभूत माहिती राहणार आहे. त्यांची सेवा, पदभार, विभागाची माहिती, कामाची पध्दत, तसेच अधिकाऱ्यांची टिप्पणी-शेरे आदींचा समावेश या मास्टर कार्डमध्ये असेल.५० हजार मालमत्ता कराविनाच्शहरात सुमारे ५० हजार मालमत्ता कराविना आहेत. पालिकेच्या सुविधा त्यांना मिळतात, पण कराची आकारणी-वसुली होत नाही. त्यांनी स्वत:हून मालमत्तेची माहिती द्यावी. नाममात्र दंड आकारून ही मालमत्ता नियमित केली जाईल, अशी योजना पालिका आणणार आहे. च्त्या काळात मालमत्ता जाहीर न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. चुकीचा किंवा कमी मालमत्ता कर लावलेल्यांनीही मालमत्ता विभागाशी संपर्क साधावा. अन्यथा नंतर कारवाई केली जाईल, असे आवाहनही पालिकेने केले आहे.