शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

केडीएमसीतील विरोधकांची अळीमिळी गुपचिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:48 IST

केडीएमसीत मंगळवारी सत्ताधारी शिवसेनेने केलेल्या आंदोलनावर विरोधकांचे टीकास्त्र सुरू झाले आहे. असे असले तरी पालिकेतील विरोधीपक्षांची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.

कल्याण : केडीएमसीत मंगळवारी सत्ताधारी शिवसेनेने केलेल्या आंदोलनावर विरोधकांचे टीकास्त्र सुरू झाले आहे. असे असले तरी पालिकेतील विरोधीपक्षांची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. प्रशासनाचा उदासीन, भोंगळ कारभार आणि शिवसेना-भाजपा युतीतील कुरघोडीचे राजकारण यातही विरोधकांचा प्रभाव फारसा पडत नसल्याने विरोधीपक्ष गेले कोणीकडे?, असा सवाल उपस्थित होत आहे. विरोधाची भूमिका मांडली जाते, मात्र कालांतराने तो विरोध फिका पडत असल्याने विरोधकांची ‘अळीमिळी गुपचिळी’ असे काहीसे चित्रही पहावयास मिळते.केडीएमसीत विरोधी पक्षांचा एक इतिहास आहे. आतापर्यंत भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विरोधीपक्षाची बजावलेली भूमिका निश्चितच प्रभावी होती. २० वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत विरोधी पक्षाची भूमिका बजावली. सत्ताधारी आणि प्रशासनाने आणलेल्या चुकीच्या धोरणांना विरोध करणे हे प्रमुख काम विरोधी पक्षाचे असते. परंतु, आता तसे होत नाही. वरवरचा विरोध दिसत असल्याने विरोधकांची एकंदरीतच भूमिका संशयाच्या भोवºयात सापडत आहे.२०१० मध्ये प्रथमच महापालिका निवडणूक लढवणाºया आणि विरोधी पक्षनेतेपद पटकावणाºया मनसेने प्रारंभी विरोधीपक्ष म्हणून बजावलेली भूमिका ही वाखाणण्याजोगी होती. कालांतराने त्यांच्याविरोधाची धार बोथट झाली. हे चित्र आजच्या घडीला सुरुवातीपासून प्रकर्षाने जाणवत आहे. हे त्यांचे नेतेही कबूल करतात.केडीएमसीत मनसे हा प्रमुख विरोधीपक्ष असलातरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आजच्याघडीला विरोधात आहे. परंतु, त्यांचा विरोध कणभरही दिसून येत नाही, ही वस्तूस्थिती आहे. उलट या विरोधकांमध्येच एकमत नसल्याने याचा फायदा सत्ताधारी उठवताना दिसतात. यात सत्ताधाºयांवर अंकुश सोडाच, त्यांच्या चुकांकडे पुरते दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव पहावयास मिळत आहे.आक्रमकता नाही, ही वस्त्ूुस्थितीमनसे सभागृहात आक्रमक होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. हे गेल्या सहा वर्षांपासूनचे आमचे दुर्देव आहे. रस्त्यावर आंदोलने छेडली जातात, तेव्हा नगरसेवक सहभागी होत नाहीत. तसेच याचे पडसादही सभागृहात उमटत नाहीत, हे वास्तव आहे अशी प्रतिक्रिया मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिली.प्रभाव जाणवत नाही, हे मान्यमहापालिकेत आमचे जेमतेम चार नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांनी विरोध केला तरी त्याचा प्रभाव जाणवत नाही, हे मान्य आहे. मनसे हा प्रमुख विरोधीपक्ष आहे. त्यांनी सर्वाधिक विरोध केला पाहिजे. आमच्याकडे त्यांनी पद द्यावे. आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.