शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या फेरीतही मोर्चे, आंदोलने

By admin | Updated: April 1, 2017 05:52 IST

आरटीई प्रवेशप्रक्रियेची दुसरी फेरी सोमवारपासून सुरू झाली असून ती पहिल्या फेरीपेक्षा अधिक गोंधळाची ठरते आहे.

ठाणे : आरटीई प्रवेशप्रक्रियेची दुसरी फेरी सोमवारपासून सुरू झाली असून ती पहिल्या फेरीपेक्षा अधिक गोंधळाची ठरते आहे. सुरुवातीला एसएमएस न आल्याने आणि नंतर शाळांकडून प्रवेशासाठीचा आडमुठेपणा, शैक्षणिक शुल्काची मागणी यामुळे पालक हवालदिल झाले आहेत. पहिल्या फेरीतील मोर्चे, आंदोलनांनंतर तरी शाळांमध्ये प्रवेश घेणे सुकर होईल, अशी अपेक्षा बाळगलेले पालक दुसऱ्या फेरीतही मोर्चे, आंदोलनांचाच आधार घेण्याच्या विचारात आहेत. समान शिक्षण हक्कासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तिची दुसरी फेरी सोमवारपासून सुरू झाली असून ८ एप्रिल शेवटचा दिवस आहे. मात्र, दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच दिवशी यादीत नाव येऊनही एसएमएस न आल्याने पालकांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतरही काही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत आडमुठेपणा घेत त्याची अनेक कारणे दिली. प्रवेश देणाऱ्या शाळा शैक्षणिक साहित्यासाठी पालकांकडूनच शुल्क मागत आहेत. काही शाळा आम्ही पुस्तके मोफत देऊ, मात्र गणवेशासाठी तरी पैसे द्यावेच लागतील, असे सांगत आहेत. त्यामुळे पालक हतबल झाले आहेत. पहिल्या फेरीत अशाच विविध प्रश्नांसाठी पालकांनी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया संघटनेच्या माध्यमातून आंदोलने केली होती. परंतु, दुसऱ्या फेरीतही तोच किंबहुना त्यापेक्षा गोंधळ वाढला आहे, असे मत पालक व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या फेरीतही हे गोंधळ असेच सुरू राहिले, तर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा पालक आणि संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी) डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, अर्थात संघटनेच्या माध्यमातून आंदोलने केल्यावर काही शाळा प्रशासन माघार घेऊन सकारात्मक प्रक्रिया करतात. मात्र, एकट्याने या प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या पालकांना शाळा अरेरावी करतात. त्यामुळे अधिकाधिक पालकांनी तरी आम्हाला संपर्क करावा.-अ‍ॅड. नितीन धुळे, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, ठाणे जिल्हाध्यक्षपहिल्या फेरीत जिल्ह्यातील काही शाळांनी पालकांना फेऱ्या घालायला लावल्या होत्या. अशा ६-७ शाळा होत्या. त्यांना समज दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. दुसरी फेरी ८ तारखेपर्यंत असून या फेरीतही पहिल्या फेरीप्रमाणे पालकांच्या काही तक्रारी आल्या, तर तालुका आणि मनपानिहाय ११ समित्या पुन्हा चौकशी करतील.-मीना यादव, जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, ठाणे