शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

दुसऱ्या फेरीतही मोर्चे, आंदोलने

By admin | Updated: April 1, 2017 05:52 IST

आरटीई प्रवेशप्रक्रियेची दुसरी फेरी सोमवारपासून सुरू झाली असून ती पहिल्या फेरीपेक्षा अधिक गोंधळाची ठरते आहे.

ठाणे : आरटीई प्रवेशप्रक्रियेची दुसरी फेरी सोमवारपासून सुरू झाली असून ती पहिल्या फेरीपेक्षा अधिक गोंधळाची ठरते आहे. सुरुवातीला एसएमएस न आल्याने आणि नंतर शाळांकडून प्रवेशासाठीचा आडमुठेपणा, शैक्षणिक शुल्काची मागणी यामुळे पालक हवालदिल झाले आहेत. पहिल्या फेरीतील मोर्चे, आंदोलनांनंतर तरी शाळांमध्ये प्रवेश घेणे सुकर होईल, अशी अपेक्षा बाळगलेले पालक दुसऱ्या फेरीतही मोर्चे, आंदोलनांचाच आधार घेण्याच्या विचारात आहेत. समान शिक्षण हक्कासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तिची दुसरी फेरी सोमवारपासून सुरू झाली असून ८ एप्रिल शेवटचा दिवस आहे. मात्र, दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच दिवशी यादीत नाव येऊनही एसएमएस न आल्याने पालकांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतरही काही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत आडमुठेपणा घेत त्याची अनेक कारणे दिली. प्रवेश देणाऱ्या शाळा शैक्षणिक साहित्यासाठी पालकांकडूनच शुल्क मागत आहेत. काही शाळा आम्ही पुस्तके मोफत देऊ, मात्र गणवेशासाठी तरी पैसे द्यावेच लागतील, असे सांगत आहेत. त्यामुळे पालक हतबल झाले आहेत. पहिल्या फेरीत अशाच विविध प्रश्नांसाठी पालकांनी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया संघटनेच्या माध्यमातून आंदोलने केली होती. परंतु, दुसऱ्या फेरीतही तोच किंबहुना त्यापेक्षा गोंधळ वाढला आहे, असे मत पालक व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या फेरीतही हे गोंधळ असेच सुरू राहिले, तर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा पालक आणि संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी) डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, अर्थात संघटनेच्या माध्यमातून आंदोलने केल्यावर काही शाळा प्रशासन माघार घेऊन सकारात्मक प्रक्रिया करतात. मात्र, एकट्याने या प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या पालकांना शाळा अरेरावी करतात. त्यामुळे अधिकाधिक पालकांनी तरी आम्हाला संपर्क करावा.-अ‍ॅड. नितीन धुळे, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, ठाणे जिल्हाध्यक्षपहिल्या फेरीत जिल्ह्यातील काही शाळांनी पालकांना फेऱ्या घालायला लावल्या होत्या. अशा ६-७ शाळा होत्या. त्यांना समज दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. दुसरी फेरी ८ तारखेपर्यंत असून या फेरीतही पहिल्या फेरीप्रमाणे पालकांच्या काही तक्रारी आल्या, तर तालुका आणि मनपानिहाय ११ समित्या पुन्हा चौकशी करतील.-मीना यादव, जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, ठाणे