शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

ठाणे शहरातील बारही झाले सील

By admin | Updated: April 1, 2017 23:42 IST

शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या तसेच शहरात ५०० मीटर हद्दीत असलेल्या अनेक लोकप्रिय बार, हॉटेलना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला

ठाणे : शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या तसेच शहरात ५०० मीटर हद्दीत असलेल्या अनेक लोकप्रिय बार, हॉटेलना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला असून त्यांचे शटर डाउन झाले आहे. ठाण्यातील १५० ते २०० बार, रेस्टॉरंट, पब यांना हा निर्णय मारक ठरल्याची माहिती ठाणे हॉटेल, बार ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुशल भंडारी यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे केवळ बारमालकांचेच नव्हे, तर तेथील कामगार-कर्मचारी, वेगवेगळे पुरवठादार, रिक्षावाले अशा अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. प्रत्येक पब अथवा बारकडून सरकार तब्बल ५२ प्रकारचे कर वसूल करते. त्यामुळे शासनाचे उत्पन्नदेखील बुडणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत म्हणजेच मुलुंड मार्गावर, घोडबंदर, कळवा, खारेगाव, मुंब्रा, शीळ आदी भागांत सुमारे १५० ते २०० बार हे हाय वे ला लागून आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर ते सील करण्याचे काम सुरू झाले आहे. ठाण्यातील महामार्गापासून ५०० मीटरच्या अंतरावर असलेले शहरातील गल्लीबोळातील बार, रेस्टॉरंट, वाइन शॉप हेही या निर्णयामुळे बंद झाले आहेत किंवा त्यांनाही सील ठोकण्याची कारवाई सुरू झाली आहे. प्रत्येक बारमध्ये सुमारे ४० ते ५० जणांचा स्टॉफ आहे. त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. शिवाय भाजीपाला, मद्य, खाद्यपदार्थ, शीतपेये आदी पन्नासच्या आसपास पुरवठादारांकडून बार, पबला जिन्नस पुरवले जातात. त्यांचादेखील रोजगार बंद होणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले. काहींनी नव्याने या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. आता त्यांना किमान दीड ते पाच कोटींचा फटका बसला आहे. या सर्वांबरोबरच शासनाचा आणि महापालिकेचादेखील महसूल बुडणार आहे. बारवाल्यांकडून तब्बल ५२ प्रकारचा कर वसूल केला जातो. आता बारच सील झाले, तर हा टॅक्सही बंद होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा निर्णय सरकारला डोईजड होईल असे, भंडारी म्हणाले. शासनाने आता योग्य तो निर्णय घ्यावा आणि बारमालकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)