शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरातील बारही झाले सील

By admin | Updated: April 1, 2017 23:42 IST

शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या तसेच शहरात ५०० मीटर हद्दीत असलेल्या अनेक लोकप्रिय बार, हॉटेलना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला

ठाणे : शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या तसेच शहरात ५०० मीटर हद्दीत असलेल्या अनेक लोकप्रिय बार, हॉटेलना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला असून त्यांचे शटर डाउन झाले आहे. ठाण्यातील १५० ते २०० बार, रेस्टॉरंट, पब यांना हा निर्णय मारक ठरल्याची माहिती ठाणे हॉटेल, बार ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुशल भंडारी यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे केवळ बारमालकांचेच नव्हे, तर तेथील कामगार-कर्मचारी, वेगवेगळे पुरवठादार, रिक्षावाले अशा अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. प्रत्येक पब अथवा बारकडून सरकार तब्बल ५२ प्रकारचे कर वसूल करते. त्यामुळे शासनाचे उत्पन्नदेखील बुडणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत म्हणजेच मुलुंड मार्गावर, घोडबंदर, कळवा, खारेगाव, मुंब्रा, शीळ आदी भागांत सुमारे १५० ते २०० बार हे हाय वे ला लागून आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर ते सील करण्याचे काम सुरू झाले आहे. ठाण्यातील महामार्गापासून ५०० मीटरच्या अंतरावर असलेले शहरातील गल्लीबोळातील बार, रेस्टॉरंट, वाइन शॉप हेही या निर्णयामुळे बंद झाले आहेत किंवा त्यांनाही सील ठोकण्याची कारवाई सुरू झाली आहे. प्रत्येक बारमध्ये सुमारे ४० ते ५० जणांचा स्टॉफ आहे. त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. शिवाय भाजीपाला, मद्य, खाद्यपदार्थ, शीतपेये आदी पन्नासच्या आसपास पुरवठादारांकडून बार, पबला जिन्नस पुरवले जातात. त्यांचादेखील रोजगार बंद होणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले. काहींनी नव्याने या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. आता त्यांना किमान दीड ते पाच कोटींचा फटका बसला आहे. या सर्वांबरोबरच शासनाचा आणि महापालिकेचादेखील महसूल बुडणार आहे. बारवाल्यांकडून तब्बल ५२ प्रकारचा कर वसूल केला जातो. आता बारच सील झाले, तर हा टॅक्सही बंद होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा निर्णय सरकारला डोईजड होईल असे, भंडारी म्हणाले. शासनाने आता योग्य तो निर्णय घ्यावा आणि बारमालकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)