शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कोरोनाकाळात स्कूल बसचालक-मालकही अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसचालक-मालकांचे मोठ्या प्रमाणात ...

कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसचालक-मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हा उद्योग संकटात सापडला आहे. अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. तसेच काही बसचालक रिक्षा चालवून तर काही जण भाजीची दुकाने थाटून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. राज्य सरकारने आम्हाला कर माफ करावा तसेच दर पंधरा वर्षांनंतर स्क्रॅपमध्ये टाकण्यात येणाऱ्या बसची मुदत किमान दोन ते तीन वर्षांनी वाढवून द्यावी, अशी मागणी बसचालक-मालकांकडून करण्यात येत आहे. रिक्षाचालकांना जसे दरमहा पंधराशे रुपये अनुदान सरकारकडून देण्यात येते तसेच आमच्यासाठीही द्यावे, अशी विनंतीही बसचालक-मालकांकडून करण्यात आली. त्यातच दोन वर्षांपासून बसचा एकही ईएमआय माफ झाला नसला तरी अनेक बसेस एकाच जागी उभ्या असल्याने त्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे या बस भंगारात विकण्याची वेळ या चालकांवर आली आहे. याचाही सरकारने विचार करावा.

-------------

स्कूल बसचालक आणि मालक यांचे दीड ते दोन वर्षांत प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने स्कूल बसचालक-मालक आमच्या बाबतीतही धोरणात्मक निर्णय जाहीर करावा, आणि हातभार द्यावा.

- लक्ष्मीकांत कोसंधर, अध्यक्ष, अंबरनाथ-बदलापूर स्कूल बस असोसिएशन