शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

स्वाइनपाठोपाठ धोका डेंग्यू, मलेरियाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:01 IST

श्रावणातही मध्येच कडकडीत ऊन पडत असल्याने आणि सतत बदलत्या हवामानामुळे वेगवेगळ््या साथींनी डोके वर काढले आहे.

ठाणे : श्रावणातही मध्येच कडकडीत ऊन पडत असल्याने आणि सतत बदलत्या हवामानामुळे वेगवेगळ््या साथींनी डोके वर काढले आहे. स्वाइनपाठोपाठ ठिकठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे रूग्णही वाढत आहेत. त्याचबरोबर व्हायरल फिव्हरच्या रूग्णांनीही दवाखाने ओसंडून वाहात आहेत.स्वाइन फ्लूमुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाला असून त्याची लागण झालेल्यांची संख्या ७०० वर पोचली आहे. गेल्या चार महिन्यात ठाणे जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर स्वाइनने ३४ जणांना मृत्यू झाला. स्वाइनचे रूग्ण वाढत असतानाच वेगवेगळ््या साथींनीही डोके वर काढले आहे. डेंग्यूचे १९, मलेरियाचे २०, गॅस्ट्रोचे १६ आणि अतिसाराचे १० रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूमुळे ठाणे जिल्ह्यात पहिला रुग्ण मार्चमध्ये दगावला, एप्रिल महिन्यात दुसरा, मे महिन्यात जरी ठाणे जिल्ह्यातील दोन रुग्णांचा जिल्ह्याबाहेर मृत्यू झाला. जून महिन्यात जिल्ह्यात १२ आणि जिल्ह्याबाहेर एक असे १३ जण दगावले. जुलैत आतापर्यंत १७ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांतील २० जण ठाण्यात, पाच कल्याण-डोंबिवलीत, चार मीरा-भार्इंदरमधील तर दोघे नवी मुंबईतील आहेत. यातील २० महिला तर तीन लहान मुले आहे. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या ७०० जणांपैकी ५०८ रुग्ण हे ठाणे आणि केडीएमसी हद्दीतील आहेत. आतापर्यंत एक लाख ४३ हजार १३९ जणांनी फ्लू संदर्भात तपासणी केली.फ्लूची तपासणी केलेल्या रुग्णांपैकी ६८३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. यातील ४३४ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. २१८ जण उपचार घेत आहेत. यात ठाणे आणि कल्याणला प्रत्येकी ९७ , नवी मुंबईत २१, मीरा-भार्इंदरला तीन बाधीत रुग्णांचा समावेश आहे. उल्हासनगर आणि भिवंडीत एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नसल्याचे आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते.पावसानंतर पडलेल्या उन्हामुळे, उबदार वातावरण तयार झाल्याने सर्वत्र डासांचे प्रमाण वाढते आहे. अनेक पालिकांत कचरा वेळेत उचलला जात नसल्याने दुर्गंधी, अस्वच्छता वाढते आहे, त्याचाही परिणाम साथी वाढण्यावर होतो आहे. त्यामुळे डेंग्यू-मलेरियाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. यातील बहुसंख्या रूग्ण खाजगी रूग्णालयात आहेत. याखेरीज सर्दी-खोकला, व्हायरल तापाचे रूग्णही वाढले आहेत. यावेळी खोकल्याचे रूग्ण सलग दोन ते तीन आठवडे उपचारासाठी येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले.अशुद्ध पाण्याचा फटका : पावसामुळे खराब पाण्याचा फटका बसून गॅस्ट्रो, अतिसाराचे रूग्ण वाढत आहेत. त्यांचे प्रमाण सर्वत्र वाढते आहे. गढूळ पाणी, त्याचे पुरेसे शुद्धीकरण न होणे आणि पिण्याच्या पाण्यात अशुद्ध पाणी मिसळल्याने या साथींचे प्रमाण वाढू लागले आहे.मुलांतील साथी अधिकमुलांना ताप येत असेल तर त्याला शाळेत पाठवू नका, असे सांगण्यात डॉक्टरांनी सुरूवात केली आहे. हा ताप साधा असला तरीही काळजी म्हणून मुलांना विश्रांती घेऊ द्यावी, तसेच इतर मुलांत साथ पसरू नये यासाठी हा उपाय डॉक्टरांनी सुचवला आहे. लहान मुलांत सर्दी, खोकला, मुदतीचा ताप, अंग दुखीचे प्रमाण अधिक आहे.