शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

स्वाइनपाठोपाठ धोका डेंग्यू, मलेरियाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:01 IST

श्रावणातही मध्येच कडकडीत ऊन पडत असल्याने आणि सतत बदलत्या हवामानामुळे वेगवेगळ््या साथींनी डोके वर काढले आहे.

ठाणे : श्रावणातही मध्येच कडकडीत ऊन पडत असल्याने आणि सतत बदलत्या हवामानामुळे वेगवेगळ््या साथींनी डोके वर काढले आहे. स्वाइनपाठोपाठ ठिकठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे रूग्णही वाढत आहेत. त्याचबरोबर व्हायरल फिव्हरच्या रूग्णांनीही दवाखाने ओसंडून वाहात आहेत.स्वाइन फ्लूमुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाला असून त्याची लागण झालेल्यांची संख्या ७०० वर पोचली आहे. गेल्या चार महिन्यात ठाणे जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर स्वाइनने ३४ जणांना मृत्यू झाला. स्वाइनचे रूग्ण वाढत असतानाच वेगवेगळ््या साथींनीही डोके वर काढले आहे. डेंग्यूचे १९, मलेरियाचे २०, गॅस्ट्रोचे १६ आणि अतिसाराचे १० रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूमुळे ठाणे जिल्ह्यात पहिला रुग्ण मार्चमध्ये दगावला, एप्रिल महिन्यात दुसरा, मे महिन्यात जरी ठाणे जिल्ह्यातील दोन रुग्णांचा जिल्ह्याबाहेर मृत्यू झाला. जून महिन्यात जिल्ह्यात १२ आणि जिल्ह्याबाहेर एक असे १३ जण दगावले. जुलैत आतापर्यंत १७ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांतील २० जण ठाण्यात, पाच कल्याण-डोंबिवलीत, चार मीरा-भार्इंदरमधील तर दोघे नवी मुंबईतील आहेत. यातील २० महिला तर तीन लहान मुले आहे. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या ७०० जणांपैकी ५०८ रुग्ण हे ठाणे आणि केडीएमसी हद्दीतील आहेत. आतापर्यंत एक लाख ४३ हजार १३९ जणांनी फ्लू संदर्भात तपासणी केली.फ्लूची तपासणी केलेल्या रुग्णांपैकी ६८३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. यातील ४३४ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. २१८ जण उपचार घेत आहेत. यात ठाणे आणि कल्याणला प्रत्येकी ९७ , नवी मुंबईत २१, मीरा-भार्इंदरला तीन बाधीत रुग्णांचा समावेश आहे. उल्हासनगर आणि भिवंडीत एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नसल्याचे आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते.पावसानंतर पडलेल्या उन्हामुळे, उबदार वातावरण तयार झाल्याने सर्वत्र डासांचे प्रमाण वाढते आहे. अनेक पालिकांत कचरा वेळेत उचलला जात नसल्याने दुर्गंधी, अस्वच्छता वाढते आहे, त्याचाही परिणाम साथी वाढण्यावर होतो आहे. त्यामुळे डेंग्यू-मलेरियाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. यातील बहुसंख्या रूग्ण खाजगी रूग्णालयात आहेत. याखेरीज सर्दी-खोकला, व्हायरल तापाचे रूग्णही वाढले आहेत. यावेळी खोकल्याचे रूग्ण सलग दोन ते तीन आठवडे उपचारासाठी येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले.अशुद्ध पाण्याचा फटका : पावसामुळे खराब पाण्याचा फटका बसून गॅस्ट्रो, अतिसाराचे रूग्ण वाढत आहेत. त्यांचे प्रमाण सर्वत्र वाढते आहे. गढूळ पाणी, त्याचे पुरेसे शुद्धीकरण न होणे आणि पिण्याच्या पाण्यात अशुद्ध पाणी मिसळल्याने या साथींचे प्रमाण वाढू लागले आहे.मुलांतील साथी अधिकमुलांना ताप येत असेल तर त्याला शाळेत पाठवू नका, असे सांगण्यात डॉक्टरांनी सुरूवात केली आहे. हा ताप साधा असला तरीही काळजी म्हणून मुलांना विश्रांती घेऊ द्यावी, तसेच इतर मुलांत साथ पसरू नये यासाठी हा उपाय डॉक्टरांनी सुचवला आहे. लहान मुलांत सर्दी, खोकला, मुदतीचा ताप, अंग दुखीचे प्रमाण अधिक आहे.