शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

‘सरसकट पास’ने विद्यार्थी खूश; पालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:27 IST

अभ्यासावर परिणाम होत असल्याची तक्रार

- स्नेहा पावसकरठाणे  : गेल्या वर्षभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत आणि यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी जाहीर केला आणि तमाम विद्यार्थीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले. आपण पास होणार या बातमीने विद्यार्थी सुखावले; पण विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो आहे, संपूर्ण शिक्षण त्यांना मिळत नसून ही बाब त्यांच्या विकासाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळे हे कोरोनाचे संकट टळू दे, अशी भावना पालकवर्गातून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भाग वगळता उर्वरित कुठेही प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत, तर कालांतराने वाढती रुग्णसंख्या पाहता ग्रामीणमध्ये सुरू झालेली शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद केली गेली. जवळपास वर्षभर ऑनलाइन शिक्षणावर भर दिला गेला. मात्र, यातील अनेक अडथळे पाहता मुलांचा अभ्यासक्रम कमी केला गेला. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी कमी केला. मुलांना अभ्यासाबाबत कडक सक्ती न करण्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सुचवले. एकूणच या सगळ्यामुळे मुलांना बरीच मोकळीक मिळाली आणि आता तर मुलांचे वर्ष फुकट जाऊ नये म्हणून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णही केेले गेले. सरकारचा हा निर्णय मुलांच्या दृष्टीने हितकारक आहे. मात्र, यामुळे काही मुले अभ्यासाकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे मत काही शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.आम्ही वर्षभर अभ्यास केला; पण परीक्षा घेऊन त्याचे गुण कोणत्या आधारावर देणार हे समजतच नव्हते. त्यामुळे सरसकट उत्तीर्ण करून आम्हाला आनंद झाला आहे.-रुची गोडांबे, विद्यार्थिनी, आठवीबरीच मुले अभ्यास लक्ष देऊन करत नाहीत. क्लासची वेळ कमी झाली, अभ्यासक्रम कमी झाला. यात मुलांपर्यंत परिपूर्ण अभ्यासक्रम पोहोचतच नाही. सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय अयोग्य नाही; पण मुलांना या आयत्या उत्तीर्ण होण्याची सवय लागू नये, याची भीती वाटते.    - धर्मेश पानघरे, पालककोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा सरकारचा निर्णय योग्य वाटतो; पण अशाने अभ्यास न करणाऱ्या मुलांनाही आयते गुण मिळतात; तर मुलांचे अभ्यासाबद्दलचे गांभीर्य कमी होऊ नये आणि त्यांनी घरी राहूनही तितक्याच चिकित्सकतेने अभ्यास केला पाहिजे. मुळात लवकरात लवकर हे कोरोनाचे संकट टळले, तर मुलांना शाळेचे आणि शाळेतील अभ्यासाचे महत्त्व कळेल व ते कळले पाहिजे.                 - रामेश्वर नाचण, पालक