शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

‘सरसकट पास’ने विद्यार्थी खूश; पालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:27 IST

अभ्यासावर परिणाम होत असल्याची तक्रार

- स्नेहा पावसकरठाणे  : गेल्या वर्षभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत आणि यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी जाहीर केला आणि तमाम विद्यार्थीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले. आपण पास होणार या बातमीने विद्यार्थी सुखावले; पण विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो आहे, संपूर्ण शिक्षण त्यांना मिळत नसून ही बाब त्यांच्या विकासाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळे हे कोरोनाचे संकट टळू दे, अशी भावना पालकवर्गातून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भाग वगळता उर्वरित कुठेही प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत, तर कालांतराने वाढती रुग्णसंख्या पाहता ग्रामीणमध्ये सुरू झालेली शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद केली गेली. जवळपास वर्षभर ऑनलाइन शिक्षणावर भर दिला गेला. मात्र, यातील अनेक अडथळे पाहता मुलांचा अभ्यासक्रम कमी केला गेला. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी कमी केला. मुलांना अभ्यासाबाबत कडक सक्ती न करण्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सुचवले. एकूणच या सगळ्यामुळे मुलांना बरीच मोकळीक मिळाली आणि आता तर मुलांचे वर्ष फुकट जाऊ नये म्हणून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णही केेले गेले. सरकारचा हा निर्णय मुलांच्या दृष्टीने हितकारक आहे. मात्र, यामुळे काही मुले अभ्यासाकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे मत काही शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.आम्ही वर्षभर अभ्यास केला; पण परीक्षा घेऊन त्याचे गुण कोणत्या आधारावर देणार हे समजतच नव्हते. त्यामुळे सरसकट उत्तीर्ण करून आम्हाला आनंद झाला आहे.-रुची गोडांबे, विद्यार्थिनी, आठवीबरीच मुले अभ्यास लक्ष देऊन करत नाहीत. क्लासची वेळ कमी झाली, अभ्यासक्रम कमी झाला. यात मुलांपर्यंत परिपूर्ण अभ्यासक्रम पोहोचतच नाही. सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय अयोग्य नाही; पण मुलांना या आयत्या उत्तीर्ण होण्याची सवय लागू नये, याची भीती वाटते.    - धर्मेश पानघरे, पालककोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा सरकारचा निर्णय योग्य वाटतो; पण अशाने अभ्यास न करणाऱ्या मुलांनाही आयते गुण मिळतात; तर मुलांचे अभ्यासाबद्दलचे गांभीर्य कमी होऊ नये आणि त्यांनी घरी राहूनही तितक्याच चिकित्सकतेने अभ्यास केला पाहिजे. मुळात लवकरात लवकर हे कोरोनाचे संकट टळले, तर मुलांना शाळेचे आणि शाळेतील अभ्यासाचे महत्त्व कळेल व ते कळले पाहिजे.                 - रामेश्वर नाचण, पालक