शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

सोशल मीडियामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:31 IST

हल्लीचा जमाना हा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भरपूर वाचतो आणि भरभरून बोलतो. त्यामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट

ठाणे : हल्लीचा जमाना हा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भरपूर वाचतो आणि भरभरून बोलतो. त्यामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट, अशी आपली अवस्था झाली आहे. विशेषत: तरुणाई या मीडियाच्या आहारी गेलेली दिसते. मात्र, तरुणांनी प्रत्यक्ष पुस्तके वाचणे आणि त्यावर आपले विचार व्यक्त करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लेखक, कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.आनंद विश्व गुरुकुल येथे मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गेल्या काही दिवसांत तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या करतात, त्याचप्रमाणे तरुणांनाही जगावेसे वाटत नाही, हे मोठे दु:ख आहे. जीवन संपवण्याची इर्षा जर जीवन जगण्यासाठी कामी आणली, तर जीवन अधिक प्रेरणादायी होईल. वाङ्मयाची गोडी लागण्यासाठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. शब्दांच्या वेगवेगळ््या छटा टिपता आल्या पाहिजे. भाषा उच्चारणातूनच आपली खरी ओळख होते. भाषा आपल्याकडून निसटणे म्हणजे एक प्रकारे जीवन निसटणे होय, असेही ते म्हणाले. सोहळ्याच्या उत्तरार्धात दवणे यांनी भाषेची आनंदयात्रा हा कार्यक्रम सादर केला. याअंतर्गत त्यांनी कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर यांच्यासह स्वत:च्याही काही कविता सादर केल्या. तसेच काही लेखकांच्या साहित्यातील उताºयांचे वाचन केले. कविता म्हणजे काय, ती कशी तयार होते, हेसुद्धा दवणे यांनी सांगितले.