शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’ कायदा शाळांनी बसवला धाब्यावर

By admin | Updated: May 6, 2017 05:37 IST

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता सरकारने आणलेला आरटीई कायदा अनेक शाळांनी धाब्यावर बसवून गोरगरीब

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता सरकारने आणलेला आरटीई कायदा अनेक शाळांनी धाब्यावर बसवून गोरगरीब मुलामुलींना प्रवेश न दिल्याच्या निषेधार्थ डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाच्या (डीवायएफआय) वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.सरकारकडून आम्हाला अनुदान मिळत नाही, असे कारण देत अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले आहेत. विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणारे शाळा व्यवस्थापन शिक्षणाधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात हे आंदोलन असल्याचे फेडरेशनचे म्हणणे आहे. फेडरेशनचे डोंबिवली शहराध्यक्ष संजय गायकवाड यांनी सांगितले की, येत्या २० मे रोजी पुण्यातील शिक्षण संचालक गोंविद नलावडे यांची भेट घेऊन आरटीई प्रवेशाचा व त्याअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ७९ शाळा, तर ग्रामीण विभागात ४५ शाळा आहेत. या शाळांमधून कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळू शकतो. या कायद्यांतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, पुस्तके, बससेवा आदी सेवा शाळांनी देणे बंधनकारक आहे. परंतु, शाळा आम्हाला सरकारकडून अनुदान मिळत नसल्याची सबब सांगत पालकांना त्रास देतात. या सुविधा देण्यासाठी पैसे भरण्यास पालकांना सांगितले जाते. अन्यथा, विद्यार्थ्यांना सुविधा पुरवत नाही, अशी दमदाटीची भाषा केली जाते. डोंबिवलीतील एका शाळेने तर प्रत्येक पालकाला वेगवेगळ्या वेळी बोलवून पुस्तके ठाण्याला जाऊन एका विशिष्ट दुकानातून घेण्याचा सल्ला दिला आहे. एका विद्यार्थ्यामागे शाळेला सरकारकडून १५ ते १६ हजार रुपये अनुदान मिळते. काही अपवादात्मक शाळांना अनुदान मिळत नसेल, तर त्यासाठी त्यांनी सरकारकडे दाद मागण्याची गरज आहे. आमची संघटना अशा शाळांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील, असे गायकवाड म्हणाले. शाळांनी विद्यार्थ्यांना सुविधा न पुरवल्यास आम्ही त्यांना पुस्तके आणि गणवेशाशिवाय शाळेत बसवू. त्याशिवाय, आमच्याकडे अन्य पर्याय नाही, असेही गायकवाड म्हणाले.