शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पस्तीस नाल्यांच्या कामासाठी भार्इंदरला ८० कोटींचे कर्ज

By admin | Updated: June 9, 2015 22:47 IST

शहरातील ३५ कच्च्या नाल्यांचे पक्के बांधकाम करण्यासाठी गुरुवारी नगरविकास विभागाने मंजुरी दिल्याने पालिकेला ८०.४२ कोटींचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

भार्इंदर : शहरातील ३५ कच्च्या नाल्यांचे पक्के बांधकाम करण्यासाठी गुरुवारी नगरविकास विभागाने मंजुरी दिल्याने पालिकेला ८०.४२ कोटींचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शहरातील कच्च्या नाल्यांचे पक्के बांधकाम करण्यासाठी पालिकेने एमएमआरडीए (मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरण) कडून कर्ज मिळण्याच्या मंजुरीसाठी राज्य शासनाकडे २०१२ मध्ये प्रस्ताव पाठविला होता. शहरातील कच्चे नाले भूमाफिया तसेच काही बिल्डरांकडून पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने चोरी केले जात असत. अनेक कच्च्या नाल्यांत बेकायदेशीर भरणी करून त्यावर इमले उभे केले आहेत. यामुळे शहरातील सांडपाणी व पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत होण्यात अडचण निर्माण होत असल्याने पावसाळ्यात काही भागांत तर पूरसदृश परिस्थिती निर्माण होत होती. त्यावर तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार अरोरा यांनी २०१० मध्ये शासनाला महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शहरातील कच्च्या नाल्यांच्या पक्कया बांधकामाचा १७८ कोटी ७१ लाख खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. त्यात ५० टक्के म्हणजेच सुमारे ८९ कोटी ५० लाख रु.चा निधी शासनाने अनुदानाच्या माध्यमातून पालिकेला देण्याची विनंती केली होती. त्याला राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी मंजुरी देत निधीदेखील वर्ग केला आहे. त्यामुळे शहरात ३५ कच्च्या नाल्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले असून उर्वरित ८९ कोटी रु.चा निधी पालिकेला खर्च करायचा आहे. परंतु, पालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने पालिकेने २०१२ मध्ये एमएमआरडीएकडे कर्जाची मागणी केली होती. यावर एमएमआरडीएने पालिकेला ९० टक्के म्हणजेच ८०.४२ कोटींचे कर्ज देण्यास अनुमती दर्शविली आहे. याबाबत, पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले की, शासनाची मंजुरी मिळाल्याने पालिका एमएमआरडीएकडे कर्जासाठी नव्याने अर्ज तसेच प्रकल्पाचे सादरीकरण करून लवकरात लवकर कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. कर्ज प्राप्त झाल्यानंतर महिनाभरात पक्क्या नाल्यांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)९७ कोटी खर्चाचा प्रस्तावदुसऱ्या टप्प्यातील १५ नाल्यांच्या पक्क्या बांधकामासाठी पालिकेने राज्य शासनाकडे ९७ कोटी खर्चाचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास सुमारे ५४ किमी लांबीच्या कच्च्या नाल्यांचे रूपांतर पक्क्या नाल्यांत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.