शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील केळीच्या पानांच्या पंगती झाल्या दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST

भातसानगर : सणवार आणि लग्नसमारंभात केळीच्या पानावर वाढलेले जेवण आणखीनच रुचकर लागते. पानावर वाढलेले वरण-भात, भाजी, लाेणचे, चटणी आणि ...

भातसानगर : सणवार आणि लग्नसमारंभात केळीच्या पानावर वाढलेले जेवण आणखीनच रुचकर लागते. पानावर वाढलेले वरण-भात, भाजी, लाेणचे, चटणी आणि त्यासाेबत असलेले गाेड पदार्थ पाहूनच मन तृप्त हाेत असे. मात्र, हल्ली केळीच्या पानांची ही पंगत ग्रामीण भागातही लुप्त झाली आहे. केळीच्या पानांची जागा आता प्लास्टिक आणि थर्माकाेलच्या पत्रावळ्यांनी घेतल्याने केळीच्या पानावर जेवण्याचे समाधान दुर्मीळ झाले आहे.

ग्रामीण भागात घराच्या परसात केळीची झाडे हटकून असायची. मात्र, हल्ली केळवडच क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे केळीची पानेच मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे अनेकदा देवाला नैवेद्य दाखविण्यासाठीही केळीची पाने मिळवताना कठीण हाेऊन बसते. त्यामुळे लग्नसमारंभातील केळीच्या पानातील जेवणावळही नामशेष झाल्याने पानावर ओसंडून वाहणारे वरण, भाजीचा रस्सा घासागणिक जमा करतानाचे पंगतीतील चित्र पाहायला मिळत नाही. पानातील जीवनसत्त्व अन्नात उतरून भाेजन अधिकच रूचकर लागते. मात्र, आता केळीच्या पानांची जागा केमिकलमिश्रित पत्रावळ्यांनी घेतली आहे. थर्माकाेल, प्लास्टिकच्या पत्रावळ्यांमुळे पर्यावरणालाही हानी पाेहाेचत आहे.

पर्यावरणपूरक पत्रावळींचा वापर हवा

केळीची पाने, पळस व कुड्याच्या पानांनी बनविलेली पत्रावळी ही विघटन होणारी, खत निर्माण करणारी, मशागतीसाठी उपयुक्त असल्याने त्यांचा पर्यावरणावर कोणताही घातक परिणाम होत नाही. शिवाय, पोटात केमिकल जात नाही. त्यामुळे मानवी आरोग्यासही उपयुक्त असते. ग्रामीण भागात पानांच्या व केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा कमी झाली असली तरी आज ना उद्या लोक पानांच्या पत्रावळीचा नक्की उपयोग करतील आणि त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल, असा आशावाद आदिवासी संघटनेचे नेते पद्माकर केवारी यांनी व्यक्त केला.