शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

ग्रामीण भागातील केळीच्या पानांच्या पंगती झाल्या दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST

भातसानगर : सणवार आणि लग्नसमारंभात केळीच्या पानावर वाढलेले जेवण आणखीनच रुचकर लागते. पानावर वाढलेले वरण-भात, भाजी, लाेणचे, चटणी आणि ...

भातसानगर : सणवार आणि लग्नसमारंभात केळीच्या पानावर वाढलेले जेवण आणखीनच रुचकर लागते. पानावर वाढलेले वरण-भात, भाजी, लाेणचे, चटणी आणि त्यासाेबत असलेले गाेड पदार्थ पाहूनच मन तृप्त हाेत असे. मात्र, हल्ली केळीच्या पानांची ही पंगत ग्रामीण भागातही लुप्त झाली आहे. केळीच्या पानांची जागा आता प्लास्टिक आणि थर्माकाेलच्या पत्रावळ्यांनी घेतल्याने केळीच्या पानावर जेवण्याचे समाधान दुर्मीळ झाले आहे.

ग्रामीण भागात घराच्या परसात केळीची झाडे हटकून असायची. मात्र, हल्ली केळवडच क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे केळीची पानेच मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे अनेकदा देवाला नैवेद्य दाखविण्यासाठीही केळीची पाने मिळवताना कठीण हाेऊन बसते. त्यामुळे लग्नसमारंभातील केळीच्या पानातील जेवणावळही नामशेष झाल्याने पानावर ओसंडून वाहणारे वरण, भाजीचा रस्सा घासागणिक जमा करतानाचे पंगतीतील चित्र पाहायला मिळत नाही. पानातील जीवनसत्त्व अन्नात उतरून भाेजन अधिकच रूचकर लागते. मात्र, आता केळीच्या पानांची जागा केमिकलमिश्रित पत्रावळ्यांनी घेतली आहे. थर्माकाेल, प्लास्टिकच्या पत्रावळ्यांमुळे पर्यावरणालाही हानी पाेहाेचत आहे.

पर्यावरणपूरक पत्रावळींचा वापर हवा

केळीची पाने, पळस व कुड्याच्या पानांनी बनविलेली पत्रावळी ही विघटन होणारी, खत निर्माण करणारी, मशागतीसाठी उपयुक्त असल्याने त्यांचा पर्यावरणावर कोणताही घातक परिणाम होत नाही. शिवाय, पोटात केमिकल जात नाही. त्यामुळे मानवी आरोग्यासही उपयुक्त असते. ग्रामीण भागात पानांच्या व केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा कमी झाली असली तरी आज ना उद्या लोक पानांच्या पत्रावळीचा नक्की उपयोग करतील आणि त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल, असा आशावाद आदिवासी संघटनेचे नेते पद्माकर केवारी यांनी व्यक्त केला.