शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

ग्रामीण भागातील केळीच्या पानांच्या पंगती झाल्या दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST

भातसानगर : सणवार आणि लग्नसमारंभात केळीच्या पानावर वाढलेले जेवण आणखीनच रुचकर लागते. पानावर वाढलेले वरण-भात, भाजी, लाेणचे, चटणी आणि ...

भातसानगर : सणवार आणि लग्नसमारंभात केळीच्या पानावर वाढलेले जेवण आणखीनच रुचकर लागते. पानावर वाढलेले वरण-भात, भाजी, लाेणचे, चटणी आणि त्यासाेबत असलेले गाेड पदार्थ पाहूनच मन तृप्त हाेत असे. मात्र, हल्ली केळीच्या पानांची ही पंगत ग्रामीण भागातही लुप्त झाली आहे. केळीच्या पानांची जागा आता प्लास्टिक आणि थर्माकाेलच्या पत्रावळ्यांनी घेतल्याने केळीच्या पानावर जेवण्याचे समाधान दुर्मीळ झाले आहे.

ग्रामीण भागात घराच्या परसात केळीची झाडे हटकून असायची. मात्र, हल्ली केळवडच क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे केळीची पानेच मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे अनेकदा देवाला नैवेद्य दाखविण्यासाठीही केळीची पाने मिळवताना कठीण हाेऊन बसते. त्यामुळे लग्नसमारंभातील केळीच्या पानातील जेवणावळही नामशेष झाल्याने पानावर ओसंडून वाहणारे वरण, भाजीचा रस्सा घासागणिक जमा करतानाचे पंगतीतील चित्र पाहायला मिळत नाही. पानातील जीवनसत्त्व अन्नात उतरून भाेजन अधिकच रूचकर लागते. मात्र, आता केळीच्या पानांची जागा केमिकलमिश्रित पत्रावळ्यांनी घेतली आहे. थर्माकाेल, प्लास्टिकच्या पत्रावळ्यांमुळे पर्यावरणालाही हानी पाेहाेचत आहे.

पर्यावरणपूरक पत्रावळींचा वापर हवा

केळीची पाने, पळस व कुड्याच्या पानांनी बनविलेली पत्रावळी ही विघटन होणारी, खत निर्माण करणारी, मशागतीसाठी उपयुक्त असल्याने त्यांचा पर्यावरणावर कोणताही घातक परिणाम होत नाही. शिवाय, पोटात केमिकल जात नाही. त्यामुळे मानवी आरोग्यासही उपयुक्त असते. ग्रामीण भागात पानांच्या व केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा कमी झाली असली तरी आज ना उद्या लोक पानांच्या पत्रावळीचा नक्की उपयोग करतील आणि त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल, असा आशावाद आदिवासी संघटनेचे नेते पद्माकर केवारी यांनी व्यक्त केला.