शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

रेल्वे भुयारी मार्गाच्या रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: November 17, 2016 07:26 IST

बदलापूर बेलवली परिसरात पूर्व - पश्चिम विभागाला जोणारा महत्त्वाच्या भुयारी मार्गावर पाणी साचत असल्याने हा रस्ता नेहमीच धोकादायक राहिला आहे.

बदलापूर : बदलापूर बेलवली परिसरात पूर्व - पश्चिम विभागाला जोणारा महत्त्वाच्या भुयारी मार्गावर पाणी साचत असल्याने हा रस्ता नेहमीच धोकादायक राहिला आहे. मात्र पावसाळा संपल्यानंतर हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सतत पाणी साचून राहिल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे या रस्त्याला दुरुस्तीची गरज आहे. जून महिन्यात पावसाच्या सुरूवातीपासूनच येथे पाणी साचायला सुरूवात झाली होती. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात अनेक वाहने अडकण्याचे प्रकारही घडले होते. त्यामुळे बदलापूर पश्चिमेतून पूर्वेतील कात्रप वा कर्जत महामार्गावर जाण्यासाठी नागरिकांना कायम शहरातील एकमेव उड्डाण पुलावरून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांच्या संतापात अधिकची भर पडत होती. भुयारी मार्ग हा उत्तम पर्याय होता. मात्र रेल्वेच्या अभियांत्रिकी चुकांमुळे दुरूस्तीनंतरही भुयारी मार्ग पाण्याखालीच होता. आॅक्टोबरच्या अखेरीस भुयारी मार्गातील पाणी आटल्याने अखेर भुयारी मार्ग वाहनांसाठी खुला झाला आहे. मात्र पाच महिने पाणी साचल्याने येथील रस्त्यावरील काँक्रीट अक्षरश: वाहून गेले आहे. अनेक दुचाकी चालक येथे घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन हा रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित करण्याची गरज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)