शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

‘समृद्धी’चा महामार्ग उड्डाणमार्ग करा

By admin | Updated: March 23, 2017 01:31 IST

मुंबई-नाशिक महामार्ग सहा पदरी होत आहे. त्यामुळे ‘समृध्दी’चा नवा महामार्गन बनविता तो त्याच महामार्गात समाविष्ट करावा.

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्ग सहा पदरी होत आहे. त्यामुळे ‘समृध्दी’चा नवा महामार्गन बनविता तो त्याच महामार्गात समाविष्ट करावा. शिवाय हा महामार्ग जमिनीवरून न नेता तो उन्नत किंवा उड्डाण महामार्ग करावा, असा पर्याय संघर्ष समितीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडला. त्यावर २७ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवली आहे. सध्या केवळ सर्वेक्षण आणि जमिनीच्या मोजणीचे काम सुरु असून त्याला गावकऱ्यांनी विरोध करु नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याने त्यांच्याशी बुधवारी चर्चा झाली. पण त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. या महामार्गासाठी सध्या सुरु असलेली जमीनमोजणी म्हणजे जमिनीचे अधिग्रहण किंवा ताबा घेणे नव्हे. शेतकऱ्यांनी कुठल्याही गैरसमजाला बळी पडू नये. त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊनच आम्ही पुढे जाऊ, असे आश्वान जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे समजावून घेतले. पोलिसांकडून काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातून कुठलाही कटू प्रसंग उद््भवू नये आणि शेतकऱ्यांची बाजूही समजून घ्यावी, म्हणून ही बैठक बोलावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासन शेतक ऱ्यांच्या बाजूने आहे. गुन्हे दाखल केल्याबाबत पोलिसांकडून तत्काळ माहिती घेऊ. विनाकारण गुन्हे दाखल झाले असल्यास ते मागे घेतले जातील, असे आश्वासन कल्याणकर यांनी दिले. सरकारबाहेरील कुठलीही व्यक्ती जमीन मोजणी किंवा तिचे सर्वेक्षण करीत नसल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे मत प्रत्येक टप्प्यावर प्रशासन विचारात घेत आहे आणि म्हणूनच राज्यात कुठेही नाही, असा थेट जमीन खरेदीचा पर्याय जिल्हा प्रशासनाने या समृद्धी महामार्गाबाबत सरकारला सुचविला आणि तो मान्य झाला आहे. ज्या शेतक ऱ्यास जमिनीच्या पुलिंग योजनेमध्ये सहभाग घ्यावयाचा असेल, तो घेऊ शकेल अशी मुभाही शासनाने दिली आहे.या बैठकीत शेतकऱ्यांनी काही पर्याय मांडले. ते लगेचच एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचून त्यावर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या दुतर्फा बफर झोन जाहीर झालेला नाही, असे स्पष्ट करीत याबाबत त्वरित एमएसआरडीसीकडून तसे लेखी घेण्यात येईल. त्याचबरोबर एमएसआरडीसीच्या मुख्य अभियंत्याबरोबर शेतकऱ्यांची बैठक घेऊ. या समृद्धी महामार्गाबाबत थ्रीडी सादरीकरण करून शंका - गैरसमज दूर करण्यात येतील. या भागातील अल्पभूधारक आणि कूळ प्रकरणातल्या जमिनींच्या सुनावण्या लगेच घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. कल्याण येथील नवनगरचा नोड शेतकऱ्यांची संमती नसल्याने रद्द केल्याची कल्पना त्यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविल्याशिवाय पुढे जाणार नाही, असेही स्पष्ट केले. यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, उप जिल्हाधिकारी रेवती गायकर, प्रांत अधिकारी संतोष थिटे, प्रसाद उकर्डे, तहसीलदार किरण सुरवसे, वैशाली लंभाते उपस्थित होते.संजय मोरे, घन:श्याम पाटील, सुदाम पाटील, विश्वनाथ जाधव, चंद्रकांत भोईर, राजाराम चौधरी, ठाकरे आदींनी शेतकऱ्यांनी विचार मांडले. (प्रतिनिधी)