शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

रिपाइंच्या बालेकिल्ल्याला भगदाड

By admin | Updated: January 12, 2017 07:04 IST

सुभाष टेकडी परिसर हा उल्हासनगरमधील आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू मानला जातो.

उल्हासनगर : सुभाष टेकडी परिसर हा उल्हासनगरमधील आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू मानला जातो. मात्र गेल्या निवडणुकीत बसप, काँग्रेसने रिपाइंच्या या बालेकिल्याला भगदाड पाडले. सहा नगरसेवक निवडून येत असल्याने महत्त्वाच्या ठरलेल्या रिपाइंच्या विविध गटांनी बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी पुन्हा कंबर कसली असून राजकीय समीकरणे जुळवण्यास सुरूवात केली आहे. येथील समस्या कमी न होता उलट वाढल्याचा दावा त्यांनी केल्याने एकीकडे पुन्हा ताबा मिळवण्यासाठी रिपाइंचा संघर्ष, त्याचवेळी अस्तित्व टिकवण्यासाठी बसप, काँग्रेस यांची निकराची लढाई होण्याची दाट चिन्हे आहेत. सुभाष टेकडीचा परिसर नेहमी रिपाइंचा बालेकिल्ला राहिला आहे. येथून विविध रिपाइं गटाचे उमेदवार निवडून आले. मात्र पाणी, रस्ते, तुंबलेली गटारे, साफसफाई आदी मुलभूत समस्या ‘जैसे थे’ राहिल्याने मतदारांनी रिपाइंच्या उमेदवारांना नाकारले. परिसरातील मुलभूत समस्या काही प्रमाणात सुटतील, या अपेक्षेने त्यांनी आपला राजकीय कल बदलला. मात्र पाच वर्षानंतरही समस्या तशाच आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार साईनगर, आंबेडकर चौक परिसर शेजारच्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. हा बालेकिल्ला हाती येण्यासाठी ऐक्याची हाक होती. मात्र त्याला यश आलेले नाही. (प्रतिनिधी)