शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

रिंगरूटच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: May 27, 2016 04:20 IST

२७ गावांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकत्याच मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार मानपाडा (मानगाव) गावातून जाणाऱ्या रिंगरूटच्या

- अरविंद म्हात्रे,  चिकणघर २७ गावांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकत्याच मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार मानपाडा (मानगाव) गावातून जाणाऱ्या रिंगरूटच्या भूसर्वेक्षणासाठी आलेल्या एमएमआरडीए, कल्याण-डोंबिवली महापालिकेचा नगररचना विभाग आणि भूमापक विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या विरोधामुळे गुरुवारी माघारी परतावे लागले.महापालिकेच्या नगररचना विभागाच्या नियोजनानुसार गुरुवारी अधिकारी मानपाडा गावात जमिनी मोजण्यासाठी आले असल्याचे कळताच संघर्ष समितीच्या नेत्यांनी धाव घेऊन अधिकाऱ्यांना मोजणी करण्यापासून रोखले. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होत नाही, तोपर्यंत सर्व गावांत कोणत्याही शासकीय योजनेला सहकार्य केले जाणार नाही, असा पवित्रा या वेळी संघर्ष समितीने घेतला. त्यामुळे अधिकारी मोजणी न करताच परत गेले. तत्पूर्वी समितीच्या नेत्यांनी विरोधाबाबतचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. या वेळी २०० नागरिकांसह संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, तकदीर काळण, अ‍ॅड. शिवराम गायकर, बाळकृष्ण पाटील, दत्ता वझे आदी उपस्थित होते. एमएमआरडीएच्या आराखड्यानुसार सागाव, भोपर, घारिवली, मानपाडा (मानगाव) आणि हेदुटणे गावांतून नियोजित रिंगरूट जात आहे. तो ३० ते ४५ मीटर रुंद आहे. या रस्त्यासाठी ग्रामस्थांच्या शेतजमिनी बाधित होत आहेत. त्यांच्या नुकसानभरपाईबाबत काहीही तरतूद न करताच अधिकारी आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.मुख्यमंत्री जोपर्यंत २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेची घोषणा करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही शासकीय योजनांना सहकार्य करणार नाही. - गुलाब वझे, उपाध्यक्ष, २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीआम्ही रिंगरूटसाठी जमीन मोजण्यासाठी गेलो होतो. मात्र, मोजणी करण्यास संघर्ष समितीने विरोधी दर्शवल्याने आम्हाला परतावे लागले. विरोधाबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.- रमेश नरमवार, भूमापन अधिकारी