शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

रिंगरूटच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: May 27, 2016 04:20 IST

२७ गावांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकत्याच मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार मानपाडा (मानगाव) गावातून जाणाऱ्या रिंगरूटच्या

- अरविंद म्हात्रे,  चिकणघर २७ गावांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकत्याच मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार मानपाडा (मानगाव) गावातून जाणाऱ्या रिंगरूटच्या भूसर्वेक्षणासाठी आलेल्या एमएमआरडीए, कल्याण-डोंबिवली महापालिकेचा नगररचना विभाग आणि भूमापक विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या विरोधामुळे गुरुवारी माघारी परतावे लागले.महापालिकेच्या नगररचना विभागाच्या नियोजनानुसार गुरुवारी अधिकारी मानपाडा गावात जमिनी मोजण्यासाठी आले असल्याचे कळताच संघर्ष समितीच्या नेत्यांनी धाव घेऊन अधिकाऱ्यांना मोजणी करण्यापासून रोखले. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होत नाही, तोपर्यंत सर्व गावांत कोणत्याही शासकीय योजनेला सहकार्य केले जाणार नाही, असा पवित्रा या वेळी संघर्ष समितीने घेतला. त्यामुळे अधिकारी मोजणी न करताच परत गेले. तत्पूर्वी समितीच्या नेत्यांनी विरोधाबाबतचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. या वेळी २०० नागरिकांसह संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, तकदीर काळण, अ‍ॅड. शिवराम गायकर, बाळकृष्ण पाटील, दत्ता वझे आदी उपस्थित होते. एमएमआरडीएच्या आराखड्यानुसार सागाव, भोपर, घारिवली, मानपाडा (मानगाव) आणि हेदुटणे गावांतून नियोजित रिंगरूट जात आहे. तो ३० ते ४५ मीटर रुंद आहे. या रस्त्यासाठी ग्रामस्थांच्या शेतजमिनी बाधित होत आहेत. त्यांच्या नुकसानभरपाईबाबत काहीही तरतूद न करताच अधिकारी आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.मुख्यमंत्री जोपर्यंत २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेची घोषणा करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही शासकीय योजनांना सहकार्य करणार नाही. - गुलाब वझे, उपाध्यक्ष, २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीआम्ही रिंगरूटसाठी जमीन मोजण्यासाठी गेलो होतो. मात्र, मोजणी करण्यास संघर्ष समितीने विरोधी दर्शवल्याने आम्हाला परतावे लागले. विरोधाबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.- रमेश नरमवार, भूमापन अधिकारी