शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएमुळे कल्याण-डोंबिवलीला लाभणार रिंग रोडचे वरदान

By admin | Updated: January 6, 2017 06:17 IST

केडीएमसी क्षेत्रासह आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेऊन प्रस्तावित रिंग रोडसाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला आहे

नारायण जाधव, ठाणेकेडीएमसी क्षेत्रासह आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेऊन प्रस्तावित रिंग रोडसाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला आहे. सुमारे ६० लाख लोकसंख्येला सुखकर प्रवासाकरिता वरदान ठरणाऱ्या ८३० कोटी खर्चाच्या व ३० किमी लांबीच्या या रिंग रोडच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. एकूण सातपैकी पहिल्या तीन टप्प्यांच्या कामासाठी अपेक्षित खर्च २२९ कोटी ४० लाख ४२ हजार ९२७ रुपये आहे.कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासात हा रस्ता मैलाचा दगड ठरणार असून परिसरातील बांधकाम क्षेत्रालाही नवी झळाळी मिळणार आहे. परिसरातील सुमारे २१ गावांच्या हद्दीतून हा रस्ता जाणार असून तो टिटवाळामार्गे प्रस्तावित भिवंडी-पनवेल मार्गाला जाऊन मिळणार आहे. सध्या कल्याण तालुक्यातील त्या २७ गावांसह टिटवाळा भागात मोठमोठ्या विकासकांच्या टाउनशिप आकार घेत आहेत. त्यांच्यासाठी हा रिंगरोड सोयीचा होणार आहे. ३० ते ४५ मीटर विस्तीर्ण असलेल्या या मार्गावरील वाहनांचा वेग तासाला ८० किमी गृहीत धरून एमएमआरडीए त्याची बांधणी करणार आहे.पहिल्या तीन टप्प्यांतील कामे सध्या एमएमआरडीएने या रिंग रोडच्या तीन टप्प्यांतील कामांच्या निविदा मागवल्या आहेत. यात गांधारे ब्रिज ते मांडा-टिटवाळा जंक्शन हे १४४ कोटी ५७ लाख २१ हजार २७० रुपये, मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन हे सुमारे ७३ कोटी ४५ लाख ८९ हजार ४२३ रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात टिटवाळा जंक्शन ते राज्य महामार्ग क्रमांक ३५ या कामांचा समावेश आहे. यामुळे दुर्गाडी ते टिटवाळा परिसराचा सुसाट विकास होण्यास मदत आहे.या २१ गावांना होणार फायदा३० किमीचा हा रिंग रोड ज्या २१ गावांतून जाणार आहे, त्यामध्ये आयरे, कोपर, डोंबिवली, मोठागाव-ठाकुर्ली, गावदेवी, शिवाजीनगर, चोळे, कांचनगाव, कचोरे, कल्याण,वाडेघर, उंबर्डे, कोळीवली, गांधारे, बारवे, वडवली, अटाळी, आंबिवली, बल्याणी, मांडा आणि टिटवाळा यांचा समावेश आहे.एमएमआरडीएच्या नियोजनानुसार हा रस्ता ३१.३५ किमी लांबीचा होता. मात्र, आता त्यातून गोंविदवाडी बायपास वगळण्यात आल्याने तो ३० किमीचा राहणार आहे. हेदुटणे ते टिटवाळा परिसरातून तो जाणार असून त्यावर २१ छोटे पूल, ३ उड्डाणपूल, ४१ कल्व्हर्ट राहणार आहेत. ३० ते ४५ मीटर इतकी त्याची रुंदी राहणार आहे. यामुळे टीसीसी औद्योगिक वसाहत, तळोजा औद्योगिक वसाहतींमार्गे तो एकीकडे ठाणे, नवी मुंबईला जोडला जाणार आहे. शिवाय, भिवंडी-पनवेल मार्गासह शिरगावफाटा येथे बदलापूरला मिळणार आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीच्या विकास आराखड्यातील मिसिंग लिंकला कनेक्ट करून शहराला वळसा घालणार असल्याने केडीएमसीचा नागरी विकास झपाट्याने होण्यास आणि रस्ता वाहतूक सुसज्ज करण्यास त्याची मदत होणार आहे.