शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

निवडणुकीत रिचवली १०.७४ लाख लीटर व्हिस्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:05 IST

बीअरची विक्री ९७६४ लीटरने घटली, अमली पदार्थांची मागणी वाढली

सुरेश लोखंडेठाणे : उन्हाच्या दाहकतेपासून काहीअंशी बचाव व्हावा, यासाठी चिल्ड बीअरला मोठ्या प्रमाणात पसंती असते. मात्र, यंदा उलटेच झाले. बीअरऐवजी लोकांनी व्हिस्कीला अधिक पसंती दिली. निवडणुकीच्या उत्साहपूर्ण वातावरणाची भर पडल्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात गेल्या एका महिन्यातच १० लाख ७३ हजार ९५ लीटर व्हिस्कीची विक्री झाली. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये १२ हजार ६५४ लीटरने वाढ झाली आहे. या एका महिन्यात १७ लाख २७ हजार २१५ लीटर बीअर ठाणेकरांनी रिचवली आहे. मागील वर्षापेक्षा नऊ हजार ७६४ लीटरने तिची विक्री कमी झाली आहे.

उन्हामुळे अवघा महाराष्ट्र व ठाणे जिल्हा होरपळून निघत आहे. या जीवघेण्या तापमानात व्हिस्कीऐवजी बीअरला पसंती मिळणे क्रमप्राप्त होते. पण, तसे न होता उलट झाले. उन्हाची तमा न बाळगता निवडणूक प्रचाराच्या या धामधुमीत बीअर पिणाऱ्यांनी व्हिस्कीला पसंती दिली आणि १२ हजार ६५४ लीटर व्हिस्कीच्या विक्रीत वाढ झाली.एवढेच नव्हे तर कण्ट्री दारूच्या विक्रीतही वाढ झाली आहे. ३२ हजार लीटरपेक्षा जास्त कण्ट्री दारूची विक्री झाली आहे. त्यातुलनेत मागील वर्षी ३१ हजार ९०० लीटर कण्ट्री दारूची विक्री झाली होती. यास अनुसरून १०० लीटरपेक्षा जास्त कण्ट्री दारू विकल्या गेल्याचे आढळून आले आहे. या पाहणीसाठी ११ मार्च ते २५ एप्रिलपर्यंतच्या या कालावधीची तुलना मागील वर्षाच्या विक्रीशी करून हा अहवाल केला आहे.

5.37 कोटींचे अमली पदार्थ जप्तठाणे लोकसभेसह कल्याण, भिवंडी या मतदारसंघांतूनदेखील ३३ लाख ६५ हजार ६६ लीटर अवैध दारू जप्त झाली आहे. यामध्ये हातभट्टीसह कण्ट्री दारू, व्हिस्की, बीअर, ताडी आणि मोहाच्या फुलांची आदी ४० लाख ६९ लाख ६५४ रुपये किमतीची दारू जप्त केलेली आहे.

७९ हजार ४४३ मि. गॅ्रम अमली पदार्थही या काळात जप्त झाले आहे. यांची किंमत सुमारे पाच कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व ठाणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.

निवडणुकीच्या या प्रचार कालावधीत निवडणूक यंत्रणेसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पाहणी अहवालासह पोलिसांनी कारवाई करून जिल्ह्यातील अवैध दारूसाठा उघडकीस केला आहे.

टॅग्स :thaneठाणे