शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

नेवाळी विमानतळाची जागा परत द्या

By admin | Updated: January 11, 2016 02:33 IST

ब्रिटिशकालीन नेवाळी (ता. कल्याण) विमानतळाची जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे ती शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धर

सुरेश लोखंडे,  ठाणेब्रिटिशकालीन नेवाळी (ता. कल्याण) विमानतळाची जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे ती शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली; मात्र त्या जागेची मालकी नौदलाकडे असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर अधिक बोलणे टाळल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील ही चर्चा पुन्हा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वारस आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांना ने-आण करण्यासाठी व मालवाहू विमाने उतरविण्यासाठी ब्रिटिशांनी नेवाळी येथे विमानतळ सुरू केले होते. सुमारे सतराशे एकरच्या परिसरातील या विमानतळाचे अस्तित्व तत्कालीन धावपट्टीद्वारे आजही सिद्ध होत आहे. या विमानतळासाठी तत्कालीन शेतकऱ्यांकडून ब्रिटिशांनी या शेतजमिनी प्राप्त केल्या होत्या. विमानतळाचा वापर करणे थांबल्यानंतर त्या जमिनी परत देण्याचा करार झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची ही बाजू मांडण्याचा प्रयत्न संबंधित लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केला. यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या डीपीसीतही तो झाला. मात्र, तो विषय आता नौदलाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर बोलणे टाळले.या विमानतळाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवण्यास भाग पाडले होते. आता ही जागा संपूर्णपणे नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती आता त्यांच्याकडे मिळेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नौदलाने संबंधित शेतकऱ्यांना या जमिनीचा संपूर्ण मोबदला दिल्याचेही सांगितले जात आहे. तरीदेखील, संबंधित शेतकऱ्यांचे वारस शोधण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला असता केवळ १९ शेतकऱ्यांचे वारस आढळून आले. उर्वरित शेतकऱ्यांचे वारस मात्र आढळत नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.