शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

नेवाळी विमानतळाची जागा परत द्या

By admin | Updated: January 11, 2016 02:33 IST

ब्रिटिशकालीन नेवाळी (ता. कल्याण) विमानतळाची जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे ती शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धर

सुरेश लोखंडे,  ठाणेब्रिटिशकालीन नेवाळी (ता. कल्याण) विमानतळाची जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे ती शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली; मात्र त्या जागेची मालकी नौदलाकडे असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर अधिक बोलणे टाळल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील ही चर्चा पुन्हा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वारस आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांना ने-आण करण्यासाठी व मालवाहू विमाने उतरविण्यासाठी ब्रिटिशांनी नेवाळी येथे विमानतळ सुरू केले होते. सुमारे सतराशे एकरच्या परिसरातील या विमानतळाचे अस्तित्व तत्कालीन धावपट्टीद्वारे आजही सिद्ध होत आहे. या विमानतळासाठी तत्कालीन शेतकऱ्यांकडून ब्रिटिशांनी या शेतजमिनी प्राप्त केल्या होत्या. विमानतळाचा वापर करणे थांबल्यानंतर त्या जमिनी परत देण्याचा करार झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची ही बाजू मांडण्याचा प्रयत्न संबंधित लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केला. यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या डीपीसीतही तो झाला. मात्र, तो विषय आता नौदलाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर बोलणे टाळले.या विमानतळाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवण्यास भाग पाडले होते. आता ही जागा संपूर्णपणे नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती आता त्यांच्याकडे मिळेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नौदलाने संबंधित शेतकऱ्यांना या जमिनीचा संपूर्ण मोबदला दिल्याचेही सांगितले जात आहे. तरीदेखील, संबंधित शेतकऱ्यांचे वारस शोधण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला असता केवळ १९ शेतकऱ्यांचे वारस आढळून आले. उर्वरित शेतकऱ्यांचे वारस मात्र आढळत नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.