शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

रुग्णालयाच्या आवारात आरोप-प्रत्यारोपांची राळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

ठाणे : वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि बड्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी हजेरी ...

ठाणे : वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि बड्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तसेच आमदार निरंजन डावखरे यांच्याबरोबरच मनसेच्या नेत्यांसह अनेक स्थानिक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी या नेत्यांनी केली. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रकरणावरून यंत्रणेवरच टीका करून ठाकरे सरकारवरच निशाणा साधला. तर या प्रकरणात दोषी असलेल्या रुग्णालयाच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली. सरकारचे प्रतिनिधी म्हणून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकारची चौकशीचे आदेश देतानाच महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक रुग्णालयांचा ऑक्सिजनबाबत आढावा घेतला जात असल्याचे सांगितले.

चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई

या संपूर्ण प्रकरणाची भिवंडी महापालिकेचे आयुक्त पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांची चौकशी समिती नेमली असून, चौकशीनंतर या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. ऑक्सिजनअभावी हा प्रकार झाला असता तर अनेक रुग्णांचे प्राण गेले असते. मात्र, चौकशी नंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. या रुग्णालयात ३५ आणि १२ असे दोन आयसीयू येथे आहेत. त्यातील ३५ मधील चार जणांचे मृत्यू झालेले आहेत; परंतु या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. तर बिलाच्या बाबतीतही चौकशी करून ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. ठाण्याला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.

- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

....

दोन दिवसांत कारवाई करा :

ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, संबंधित हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी कोणाकडे होती? ऑक्सिजन साठा संपुष्टात येत असतानाही तातडीच्या उपाययोजना का केल्या नाहीत? पुरेसा ऑक्सिजन साठा ठेवण्याची दक्षता का घेतली गेली नाही? या घटनेला कोण जबाबदार आहे? या विविध मुद्द्यांबाबत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून दोषींवर दोन दिवसांत कारवाई करावी.

-निरंजन डावखरे, आमदार भाजप

ऑक्सिजन ही अत्यावश्यक बाब आहे, त्याचे नियोजन करणे गरजेचे होते. हॉस्पिटल प्रशासनाच्या चुकीमुळे चार जणांचे मृत्यू झालेले आहेत. एकीकडे ऑक्सिजन असल्याचे सांगितले जात आहे; परंतु तो पुरवठा होत आहे का? हे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी.

-संदीप पांचगे, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष, ठाणे

ही माणुसकीला काळिमी फासणारी घटना आहे. वारंवार येथे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालय प्रशासनावर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

-महेश कदम, मनसे नेते