शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाच्या आवारात आरोप-प्रत्यारोपांची राळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

ठाणे : वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि बड्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी हजेरी ...

ठाणे : वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि बड्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तसेच आमदार निरंजन डावखरे यांच्याबरोबरच मनसेच्या नेत्यांसह अनेक स्थानिक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी या नेत्यांनी केली. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रकरणावरून यंत्रणेवरच टीका करून ठाकरे सरकारवरच निशाणा साधला. तर या प्रकरणात दोषी असलेल्या रुग्णालयाच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली. सरकारचे प्रतिनिधी म्हणून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकारची चौकशीचे आदेश देतानाच महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक रुग्णालयांचा ऑक्सिजनबाबत आढावा घेतला जात असल्याचे सांगितले.

चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई

या संपूर्ण प्रकरणाची भिवंडी महापालिकेचे आयुक्त पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांची चौकशी समिती नेमली असून, चौकशीनंतर या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. ऑक्सिजनअभावी हा प्रकार झाला असता तर अनेक रुग्णांचे प्राण गेले असते. मात्र, चौकशी नंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. या रुग्णालयात ३५ आणि १२ असे दोन आयसीयू येथे आहेत. त्यातील ३५ मधील चार जणांचे मृत्यू झालेले आहेत; परंतु या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. तर बिलाच्या बाबतीतही चौकशी करून ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. ठाण्याला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.

- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

....

दोन दिवसांत कारवाई करा :

ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, संबंधित हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी कोणाकडे होती? ऑक्सिजन साठा संपुष्टात येत असतानाही तातडीच्या उपाययोजना का केल्या नाहीत? पुरेसा ऑक्सिजन साठा ठेवण्याची दक्षता का घेतली गेली नाही? या घटनेला कोण जबाबदार आहे? या विविध मुद्द्यांबाबत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून दोषींवर दोन दिवसांत कारवाई करावी.

-निरंजन डावखरे, आमदार भाजप

ऑक्सिजन ही अत्यावश्यक बाब आहे, त्याचे नियोजन करणे गरजेचे होते. हॉस्पिटल प्रशासनाच्या चुकीमुळे चार जणांचे मृत्यू झालेले आहेत. एकीकडे ऑक्सिजन असल्याचे सांगितले जात आहे; परंतु तो पुरवठा होत आहे का? हे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी.

-संदीप पांचगे, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष, ठाणे

ही माणुसकीला काळिमी फासणारी घटना आहे. वारंवार येथे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालय प्रशासनावर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

-महेश कदम, मनसे नेते