शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

‘दोस्ती’चे रहिवासी समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: July 8, 2017 05:37 IST

ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल तसेच मानपाडा येथील दोस्ती इम्पारिया इमारतींमध्ये अनेक गैरसोयी असल्यामुळे येथील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल तसेच मानपाडा येथील दोस्ती इम्पारिया इमारतींमध्ये अनेक गैरसोयी असल्यामुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या समस्या सोडविण्यासाठी येथील रहिवाशांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनाच निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.आयुक्तांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष निकम यांनी म्हटले आहे की, वर्तकनगरच्या दोस्ती रेंटल आणि मानपाडा येथील दोस्ती इम्पारिया येथील इमारतींना सुरक्षारक्षकच नसतो. लिफ्ट बंद पडल्यानंतर त्यामध्ये अडकलेल्यांसाठी अग्निशमन दल किंवा पोलिसांना पाचारण करावे लागते. त्यांच्या मदतीनेच अडकलेल्यांना बाहेर काढले जाते. या लिफ्टची एकमेव चावी बिल्डरच्या ताब्यात असते.गेल्या तीन वर्षांत पाण्याच्या टाकीची स्वच्छताच न झाल्यामुळे रहिवाशांना गढूळ पाणी प्यावे लागते. या दोन्ही ठिकाणी कचरा काढण्यासाठी ठामपाकडून उपायोजना न झाल्याने याठिकाणी कचऱ्याचे ढीग पहायला मिळतात. फायर सेफ्टी रुममध्येही काहींनी संसार थाटले आहे. ड्रेनेज लाइन फुटल्यामुळे सांडपाण्यासह मलमूत्र रस्त्यावर येते. त्यामुळेच मानपाडा पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले आहे. वर्तकनगर येथे जनरेटरची सुविधा आहे; परंतु, मानपाडा येथे वीज खंडित झाल्यानंतर १८ व्या मजल्यावर जाण्यासाठी कोणताच पर्याय उपलब्ध नाही. याशिवाय, दोन ते तीन वर्षे फायर सेफ्टी आॅडिट झाले नाही. अग्निप्रतिबंधक विभागाची सर्व सामुग्रीही चोरीस गेलेली आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास याठिकाणी मोठी हानी होऊ शकते. या दोन्ही ठिकाणी आरोग्य विभागाकडून फायलेरिया किंवा मलेरिया प्रतिबंधक औषध फवारणीही झालेली नाही.