शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बदलापुरात नुकसानभरपाईच्या पंचनाम्यानंतरही रहिवाशांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

बदलापूर : बदलापूर शहरात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक वसाहतींमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तहसील कार्यालयाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू ...

बदलापूर : बदलापूर शहरात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक वसाहतींमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तहसील कार्यालयाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू केले. पंचनाम्यानंतर नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. पुरानंतर केवळ पंचनामे होतात, मदत मिळत नाही, असा आरोप रहिवाशांनी केला.

उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे बदलापूर शहरातील किनाऱ्यालगत असलेल्या अनेक वसाहतींत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. यात नागरिकांच्या गृहोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. आज या भागाची अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसानीची सविस्तर माहिती नोंद करून घेतली. २०१९ मध्ये अशाच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे केले. परंतु अनेक नागरिकांना आर्थिक मदत मिळाली नाही. मात्र किमान या वर्षी तरी नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा पूरग्रस्तांनी व्यक्त केली.

बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा, वालीवली परिसरातील अयोध्यानगरी या गृहसंकुलातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला. सकाळी या गृहसंकुलातील घरांची अधिकाऱ्यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. मात्र पूरग्रस्तांना शासनातर्फे मदत मिळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भागातील पूरग्रस्तांना मदत मिळावी, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली.

.............

वाचली