शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

बदलापुरात नुकसानभरपाईच्या पंचनाम्यानंतरही रहिवाशांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

बदलापूर : बदलापूर शहरात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक वसाहतींमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तहसील कार्यालयाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू ...

बदलापूर : बदलापूर शहरात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक वसाहतींमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तहसील कार्यालयाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू केले. पंचनाम्यानंतर नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. पुरानंतर केवळ पंचनामे होतात, मदत मिळत नाही, असा आरोप रहिवाशांनी केला.

उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे बदलापूर शहरातील किनाऱ्यालगत असलेल्या अनेक वसाहतींत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. यात नागरिकांच्या गृहोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. आज या भागाची अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसानीची सविस्तर माहिती नोंद करून घेतली. २०१९ मध्ये अशाच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे केले. परंतु अनेक नागरिकांना आर्थिक मदत मिळाली नाही. मात्र किमान या वर्षी तरी नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा पूरग्रस्तांनी व्यक्त केली.

बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा, वालीवली परिसरातील अयोध्यानगरी या गृहसंकुलातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला. सकाळी या गृहसंकुलातील घरांची अधिकाऱ्यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. मात्र पूरग्रस्तांना शासनातर्फे मदत मिळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भागातील पूरग्रस्तांना मदत मिळावी, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली.

.............

वाचली