शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

केडीएमसीच्या कारवाई पथकाने डोके फोडल्याचा रहिवाशांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील धोकादायक असलेली बाबाजी चाळ गुरुवारी तोडण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पथकाने सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील धोकादायक असलेली बाबाजी चाळ गुरुवारी तोडण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पथकाने सुरुवात केली. त्यास विरोध केल्याप्रकरणी पथकाने आपले डोके फोडून रक्तबंबाळ केल्याचा आरोप एका ७३ वर्षांच्या रहिवाशाने केला आहे. त्यामुळे संतप्त चाळकऱ्यांनी दाद मागण्यासाठी मनपा मुख्यालयात धाव घेतली. प्रवेशद्वाराजवळ आयुक्तांच्या भेटीची मागणी करीत बराच वेळ गोंधळ घातला. दरम्यान, कारवाई पथकाने संबंधित रहिवाशाला जखमी केले नसून त्याने स्वत: डोके फोडून घेतल्याचा खुलासा प्रभाग अधिकाऱ्याने केला आहे.

बाबाजी चाळ धोकादायक असल्याने मनपाने तिला नोटीस दिली होती. ही चाळ पाडण्यासाठी मनपाचे कारवाई पथक गुरुवारी दुपारी १२ वाजता पोहोचले होते. मात्र, मनपाने चाळीस कोणतीही नोटीस न देता पाडकाम सुरू केल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. मनपाने कारवाईपूर्वी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे चाळीतील रहिवाशांनी आम्ही बेघर होणार असून, आम्ही जायचे कुठे, असा सवाल करत कारवाईस विरोध केला. रहिवाशांनी कारवाईवेळी उपस्थितीत असलेल्या पोलिसांकडे दाद मागितली. मात्र, त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही.

कारवाई पथकाने आपल्या डोक्यात दांडा मारल्याने आपण रक्तबंबाळ झालो, अशी माहिती स्वत: चाळीतील रहिवासी राणा देवराज प्रजापती (वय ७३) यांनी दिली. त्यामुळे अन्य रहिवाशांनी मनपा मुख्यालयात धाव घेत जखमी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. सुरक्षारक्षकांनी त्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे रहिवाशांनी आयुक्तांना बोलवा, तरच येथून परत जाऊ, असा पवित्रा घेतला. प्रशासनाने प्रजापती यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मागविली. मात्र, आधी आयुक्तांना बोलवा नंतर उपचार करून घेऊ, या मतावर प्रजापती ठाम होते. यामुळे बराच वेळ प्रवेशद्वाराजवळ गोंधळ सुरू होता.

दरम्यान, ठाण्यात मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई पथकाने हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता कारवाईदरम्यान रहिवाशांकडून पथकाने हल्ला केल्याचा खोटा आरोप केला जात आहे. यावरून अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न होत आहे.

‘घटनेचा व्हिडिओ आहे’

या संदर्भात प्रभाग अधिकारी राजेश सावंत म्हणाले, प्रजापती यांचा आरोप चुकीचा आहे. कारवाई पथकाने त्यांना मारहाण केलेली नाही. स्वत:ला त्यांनी जखमी करून घेतले आहे. त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. ही चाळ धोकादायक झाली आहे. या चाळीचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हीजेटीआयकडून करून घेतल्यानंतर नोटिसा देऊन कारवाई केली जात आहे.

----------------------