शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

सावरकरनगरात रहिवाशांचे पाण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

ठाणे : एकीकडे कळव्यातील पाणी समस्येच्या मुद्द्यावरून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कान टोचले असताना आता सावरकरनगर ...

ठाणे : एकीकडे कळव्यातील पाणी समस्येच्या मुद्द्यावरून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कान टोचले असताना आता सावरकरनगर भागातील नागरिकांनादेखील पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्यांनी शनिवारी येथील पाण्याच्या टाकीजवळच आंदोलन करून पाणी द्या, पाणी द्या, अशा घोषणा देऊन आंदोलन केले.

ठाणे शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही आजही शहरातील अनेक भागांना कुठे कमी दाबाने तर कुठे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. कळव्यातील नागरिकांनादेखील पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांनी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाकडून मिळविले आहे. ही घटना ताजी असतानाच शनिवारी सावरकरनगरातील रहिवाशांनी राजीव शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले. मागील चार महिन्यांपासून पाण्याची समस्या सुरू आहे. दोन दिवसांआड करूनही पाणी येत नाही, त्यातही याच भागात पाण्याची टाकी असतानाही येथील रहिवाशांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नेमके पाणी कुठे मुरते, असा सवालही त्यांनी केला आहे. येथील पाण्याच्या टाकीवर असलेला एक पंप मागील वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळेदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. एकूणच या भागात पाण्याची समस्या असूनदेखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीचे हे आंदोलन केल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. या आंदोलनानंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती त्यांनी दिली.