शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सावरकरनगरात रहिवाशांचे पाण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

ठाणे : एकीकडे कळव्यातील पाणी समस्येच्या मुद्द्यावरून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कान टोचले असताना आता सावरकरनगर ...

ठाणे : एकीकडे कळव्यातील पाणी समस्येच्या मुद्द्यावरून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कान टोचले असताना आता सावरकरनगर भागातील नागरिकांनादेखील पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्यांनी शनिवारी येथील पाण्याच्या टाकीजवळच आंदोलन करून पाणी द्या, पाणी द्या, अशा घोषणा देऊन आंदोलन केले.

ठाणे शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही आजही शहरातील अनेक भागांना कुठे कमी दाबाने तर कुठे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. कळव्यातील नागरिकांनादेखील पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांनी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाकडून मिळविले आहे. ही घटना ताजी असतानाच शनिवारी सावरकरनगरातील रहिवाशांनी राजीव शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले. मागील चार महिन्यांपासून पाण्याची समस्या सुरू आहे. दोन दिवसांआड करूनही पाणी येत नाही, त्यातही याच भागात पाण्याची टाकी असतानाही येथील रहिवाशांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नेमके पाणी कुठे मुरते, असा सवालही त्यांनी केला आहे. येथील पाण्याच्या टाकीवर असलेला एक पंप मागील वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळेदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. एकूणच या भागात पाण्याची समस्या असूनदेखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीचे हे आंदोलन केल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. या आंदोलनानंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती त्यांनी दिली.