मुरलीधर भवार , डोंबिवलीडोंबिवली आणि अंबरनाथमधील २० रासायनिक कारखाने सर्वाधिक प्रदूषण करत असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी हरीत लवादापुढे सोदर केले. यातील दहा कारखाने सर्वाधिक प्रदूषण करत असल्याचे त्या म्हटले आहे. या कंपन्यांवर आठवडाभरात कारवाई करा, अन्यथा लवादाच्या घटनात्मक अधिकारांचा वापर केला जाईल, ्शी तंबी लवादाने मंडलाला पुन्हा दिली. दरम्यान, डोंबिवली व अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाची समस्या नेमकी काय आहे. ती सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा कृती आराखडा ‘वनशक्ती’ने लवादाला सादर करावा, असे लवादाने त्या संस्थेला सांगितले आहे. वनशक्तीच्या प्रदूषण प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या प्रदूषण प्रकरणात काय सुधारणा केली, प्रदूषण रोखण्यासाठी काय पावले उचलली, याचा तपशील आठवडाभरात सादर करण्याचे आदेश लवादाने ३१ आॅगस्टच्या सुनावणीदरम्यान केंद्रीय पर्यावरण खात्याच्या संचालक सचिवांना दिले होते. त्या अहवालात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २० कारखाने सर्वाधिक प्रदूषण करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र लवादासमोर सादर केले. त्यातील १० कारखान्यांकडून जास्त प्रमाणात प्रदूषण केले जात असल्याचे नमूद केले आहे. या प्रदूषणकारी कंपन्याविरोधात काय कारवाई केली जाणार आहे, ते आठवडाभरात ठरवावे; अन्यथा पुढील सुनावणीवेळी लवादाच्या घटनात्मक अधिकाराचा वापर केला जाईल, अशी तंबी पुन्हा दिली आहे. या सुनावणीदरम्यान लवादासमोर पुन्हा कारखानदारांच्या जास्तीच्या पाणीवापराचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर लवादाने डोंबिवली व अंबरनाथमधील रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषणाची समस्या, त्यावरील उपाय यांचा कृती आराखडा सादर करण्यास वनशक्ती संस्थेला सुचविल्याचे याचिकाकर्ते अश्वीन अघोर यांनी सांगितले.
प्रदूषणाचा २० कंपन्यांवर ठपका
By admin | Updated: September 15, 2016 02:14 IST