शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन समितीला तातडीने अहवाल द्या, रामदास आठवले यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:54 IST

रामदास आठवले यांचे आदेश : रिंगरोड प्रकल्पबाधितांच्या प्रश्नावर मुंबईत झाली बैठक

कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील रिंगरोड प्रकल्पात बाधित होत असलेल्या आटाळी-आंबिवली परिसरातील ८६० बाधितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी मुंबईत एमएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेतली. त्यात प्रकल्पबाधितांचा अहवाल पुनर्वसन समितीने तातडीने सादर करा, असे आदेश आठवले यांनी प्रशासनास दिले आहेत.

एमएमआरडीएतर्फे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक-४, ५, ६ आणि ७ चे काम दुर्गाडी ते टिटवाळ्यादरम्यान सुरू झाले आहे. या प्रकल्पाआड येणाऱ्या ८५० बाधितांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. याप्रकरणी आटाळी-आंबिवली सामाजिक संस्थेने महापालिकेच्या कारवाईस विरोध करीत पुनर्वसनाची मागणी केली. या मागणीसाठी प्रकल्पबाधितांनी महापालिकेवर दोनदा मोर्चा तसेच २६ जानेवारीला आंदोलनही केले होते. मात्र, प्रकल्पबाधितांना केवळ आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे समितीने रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकाराने आठवले यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार, आठवले यांनी गुरुवारी एमएमआरडीए कार्यालयात आठवले यांनी बैठक घेतली. या वेळी महापालिकेचे सहायक संचालक नगररचनाकार मा.द. राठोड, प्रभाग अधिकारी सुधीर मोकल, एमएमआरडीएचे प्रकल्प अधिकारी जयंत ढाणे व प्रकल्पबाधितांतर्फे रिपब्लिकनचे काकासाहेब खंबाळकर, जालिंदर बर्वे, नलिनी साळवे, सुवर्णा पाटील, अशोक खैरे, दादा कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी राठोड यांनी सांगितले की, प्रकल्पबाधितांना महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यानंतर, प्रकल्पबाधितांची सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर सविस्तर अहवाल महापालिकेच्या पुनर्वसन समितीसमोर सादर केला जाईल. त्यानंतर, महापालिका त्यावर निर्णय घेणार आहे. तर, ढाणे म्हणाले, प्रकल्प राबवणे हे आमचे काम आहे. प्रकल्पासाठी जागा संपादित करणे तसेच बाधितांच्या पुनर्वसनाचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घ्यायचा आहे.घरे देण्यास हरकत काय?च्या वेळी शिष्टमंडळाने आठवले यांच्याकडे मुद्दा मांडला की, महापालिकेने केंद्राच्या बीएसयूपी योजनेंतर्गत घरे बांधली आहेत. ही घरे रिंगरोड प्रकल्पबाधितांना द्यावी, अशी मागणी केली.च्आठवले यांनी घरे तयार असतील, तर ती प्रकल्पबाधितांना देण्याचा विचार होण्यास काय हरकत आहे, अशी विचारणा अधिकाºयांकडे केली. त्यावर ते म्हणाले, पुनर्वसन समिती यासंदर्भात निर्णय घेणार आहे. त्यावर आठवले यांनी तातडीने अहवाल सादर करून निर्णय घ्या, असे आदेश दिले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkalyanकल्याण