शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

पुनर्वसन समितीला तातडीने अहवाल द्या, रामदास आठवले यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:54 IST

रामदास आठवले यांचे आदेश : रिंगरोड प्रकल्पबाधितांच्या प्रश्नावर मुंबईत झाली बैठक

कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील रिंगरोड प्रकल्पात बाधित होत असलेल्या आटाळी-आंबिवली परिसरातील ८६० बाधितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी मुंबईत एमएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेतली. त्यात प्रकल्पबाधितांचा अहवाल पुनर्वसन समितीने तातडीने सादर करा, असे आदेश आठवले यांनी प्रशासनास दिले आहेत.

एमएमआरडीएतर्फे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक-४, ५, ६ आणि ७ चे काम दुर्गाडी ते टिटवाळ्यादरम्यान सुरू झाले आहे. या प्रकल्पाआड येणाऱ्या ८५० बाधितांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. याप्रकरणी आटाळी-आंबिवली सामाजिक संस्थेने महापालिकेच्या कारवाईस विरोध करीत पुनर्वसनाची मागणी केली. या मागणीसाठी प्रकल्पबाधितांनी महापालिकेवर दोनदा मोर्चा तसेच २६ जानेवारीला आंदोलनही केले होते. मात्र, प्रकल्पबाधितांना केवळ आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे समितीने रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकाराने आठवले यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार, आठवले यांनी गुरुवारी एमएमआरडीए कार्यालयात आठवले यांनी बैठक घेतली. या वेळी महापालिकेचे सहायक संचालक नगररचनाकार मा.द. राठोड, प्रभाग अधिकारी सुधीर मोकल, एमएमआरडीएचे प्रकल्प अधिकारी जयंत ढाणे व प्रकल्पबाधितांतर्फे रिपब्लिकनचे काकासाहेब खंबाळकर, जालिंदर बर्वे, नलिनी साळवे, सुवर्णा पाटील, अशोक खैरे, दादा कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी राठोड यांनी सांगितले की, प्रकल्पबाधितांना महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यानंतर, प्रकल्पबाधितांची सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर सविस्तर अहवाल महापालिकेच्या पुनर्वसन समितीसमोर सादर केला जाईल. त्यानंतर, महापालिका त्यावर निर्णय घेणार आहे. तर, ढाणे म्हणाले, प्रकल्प राबवणे हे आमचे काम आहे. प्रकल्पासाठी जागा संपादित करणे तसेच बाधितांच्या पुनर्वसनाचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घ्यायचा आहे.घरे देण्यास हरकत काय?च्या वेळी शिष्टमंडळाने आठवले यांच्याकडे मुद्दा मांडला की, महापालिकेने केंद्राच्या बीएसयूपी योजनेंतर्गत घरे बांधली आहेत. ही घरे रिंगरोड प्रकल्पबाधितांना द्यावी, अशी मागणी केली.च्आठवले यांनी घरे तयार असतील, तर ती प्रकल्पबाधितांना देण्याचा विचार होण्यास काय हरकत आहे, अशी विचारणा अधिकाºयांकडे केली. त्यावर ते म्हणाले, पुनर्वसन समिती यासंदर्भात निर्णय घेणार आहे. त्यावर आठवले यांनी तातडीने अहवाल सादर करून निर्णय घ्या, असे आदेश दिले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkalyanकल्याण