शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

‘त्या’ अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राबोडीतील खत्री इमारत दुर्घटनेनंतर आता ठामपावर टीकेची झोड उठू लागली आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : राबोडीतील खत्री इमारत दुर्घटनेनंतर आता ठामपावर टीकेची झोड उठू लागली आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही या दुर्घटनेला ठामपा अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱ्या व त्या काळात बेकायदा बांधकामाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

केवळ धोकादायक म्हणून वारंवार नोटीस बजावली होती म्हणून ठामपा जबाबदारी झटकू शकत नाही. वेळोवेळी कारवाई का केली नाही, असा सवालही काँग्रेसने केला आहे. ठामपा अस्तित्वात आल्यापासून शहरात बेकायदा बांधकामांचे पेव सुटले होते. त्यावर सातत्याने सर्वच पक्ष आवाज उचलत असतानाही ३० वर्षांत शेकडो इमारती उभ्या राहिल्या. तत्कालीन अधिकारी, याकडे बिल्डरांकडून फुटामागे व्यवहार करून थातूरमातूर कारवाई करीत होते. काही काळातच ही इमारत पूर्णपणे उभी राहते व विषय संपवला जात होता. आजही ठाण्यात हजारो निकृष्ट बेकायदा इमारती उभ्या आहेत, याला तत्कालीन अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.

खत्री मॅन्शन उभी राहात असताना कोण कोण अधिकारी याला अभय देत होते? हे शोधून काढा व त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

----------------