शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST

अंबरनाथ : अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. या धरणाची भिंत फुटून दोन वर्षांपूर्वी ...

अंबरनाथ : अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. या धरणाची भिंत फुटून दोन वर्षांपूर्वी शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.

काकोळे धरण हे जीआयपी म्हणजेच `द ग्रेट इंडियन पेनिन्सुलर` धरण म्हणून ओळखले जाते. तब्बल २०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या धरणाची निर्मिती केली. त्याकाळी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या कोळशाच्या इंजिनांना लागणारे पाणी या धरणातून पुरवले जात होते. या धरणाची मालकी ब्रिटिशांनंतर रेल्वेकडे आली असली तरी अनेक दशके या धरणाकडे कुणाचेही लक्ष नव्हते. लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी याच धरणाशेजारी रेल नीरचा प्लॅंट उभारला आणि हे धरण पुन्हा एकदा वापरात आले. मात्र या धरणाच्या भिंतीची २०० वर्षात एकदाही दुरुस्ती करण्यात आली नसल्याने भिंत कमकुवत होऊन त्यातून बाजूच्या भातशेतीत अनेक वर्षांपासून पाणी येत होते. दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या दाबाने अचानक ही भिंत फुटली आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर, अंबरनाथ, उल्हासनगर ही शहरे यांनाही धोका निर्माण झाला. त्यावेळी या भिंतीचे बांधकाम भारतीय सैन्याकडून युद्धपातळीवर करून घ्यावे, अशी मागणी काकोळे गावातले उपसरपंच नरेश गायकर यांनी केली होती. मात्र त्यावेळी तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र या धरणाच्या भिंतीचे बांधकाम नव्याने सुरू करण्यात आले आहे. यामुळे भातशेतीचा धोका टळणार आहे.

--------

फोटो

.........

वाचली