शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST

अंबरनाथ : अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. या धरणाची भिंत फुटून दोन वर्षांपूर्वी ...

अंबरनाथ : अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. या धरणाची भिंत फुटून दोन वर्षांपूर्वी शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.

काकोळे धरण हे जीआयपी म्हणजेच `द ग्रेट इंडियन पेनिन्सुलर` धरण म्हणून ओळखले जाते. तब्बल २०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या धरणाची निर्मिती केली. त्याकाळी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या कोळशाच्या इंजिनांना लागणारे पाणी या धरणातून पुरवले जात होते. या धरणाची मालकी ब्रिटिशांनंतर रेल्वेकडे आली असली तरी अनेक दशके या धरणाकडे कुणाचेही लक्ष नव्हते. लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी याच धरणाशेजारी रेल नीरचा प्लॅंट उभारला आणि हे धरण पुन्हा एकदा वापरात आले. मात्र या धरणाच्या भिंतीची २०० वर्षात एकदाही दुरुस्ती करण्यात आली नसल्याने भिंत कमकुवत होऊन त्यातून बाजूच्या भातशेतीत अनेक वर्षांपासून पाणी येत होते. दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या दाबाने अचानक ही भिंत फुटली आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर, अंबरनाथ, उल्हासनगर ही शहरे यांनाही धोका निर्माण झाला. त्यावेळी या भिंतीचे बांधकाम भारतीय सैन्याकडून युद्धपातळीवर करून घ्यावे, अशी मागणी काकोळे गावातले उपसरपंच नरेश गायकर यांनी केली होती. मात्र त्यावेळी तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र या धरणाच्या भिंतीचे बांधकाम नव्याने सुरू करण्यात आले आहे. यामुळे भातशेतीचा धोका टळणार आहे.

--------

फोटो

.........

वाचली