शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

रिलायन्स जिओ,बच्चो मरो हेच सरकारचे नवे धोरण - विवेक पंडित

By admin | Updated: September 14, 2016 13:48 IST

आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्याने हजारो बालकं कुपोषणांने त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत आहेत.

ऑनलाइन लोकमत
मोखाडा, दि. १४ - आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्याने हजारो बालकं कुपोषणांने त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत आहेत. असे असताना हे सरकार मात्र स्मार्ट आणि डिजिटल इंडिया सारखे उपक्रम प्राध्यान्य कामावर घेऊन भांडवलदारांचे हिताचे बनले आहे. 
नुकताच रिलायन्स जिओ (JIO) च्या जाहिरतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो प्रसिद्ध झाला होता. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी संताप व्यक्त केला. नुकताच राज्याच्या आदिवासी विकास मंत्री यांच्या गावातच एका कुपोषित मुलीचा मृत्यू झाला. रिलायंस जिओ(JIO) और बच्चो मरो असेच सरकारचे धोरण असल्याची सडेतोड टीका विवेक पंडित यांनी केली.
पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे सत्र अजूनही थांबलेले नाही. मोखाड्यातील सागर वाघ  आणि ईश्वर सवरा यांच्या  मृत्यूची दुर्दैवी घटना ताजी असतानाच नंतर नुकताच वाडा शहरानाजीक  पेठरंजणी या पाड्यात राहणाऱ्या एक मुलीचा कुपोषणाने दुर्दैवी अंत झाला. 
विशेष म्हणजे याच वाडा शहरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे निवासस्थान आहे. या वर्षभरात पालघर जिल्ह्यात 600 बालमृत्यू झाले आहेत त्यातील अर्ध्याहून अधिक बालमृत्यू हे सवरा यांच्या मतदारसंघातील आहेत. याबाबत वारंवार आंदोलन आणि मागण्या होऊनही सवरा यांनी कानावर हात दिले आहेत. 
आता सावरा यांच्याकडून जनतेच्या कोणत्याही  अपेक्षा उरल्या नसल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले. कुपोषणाच्या भयाण वास्तवाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रत्यक्ष कल्पना देऊनही त्यांच्याकडूनहि अपेक्षाभंग झाल्याची खंत पंडित यांनी व्यक्त केली. 
 हे सरकार भांडवलदारधार्जिणे झाले असून  गरिबांच्या वेदनेच्या संवेदना या सरकार मध्ये शिल्लक नसल्याचा आरोप पंडित यांनी  केला.  पंडित यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले असून अजूनही वेळ गेली नसल्याचे सांगितले आहे, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक कार्यक्रमाची अजून काही काळ वाट पाहू. त्यानंतरही सरकारच्या संवेदना जागृत झाल्या नाही तर अत्यंत आंदोलनास सुरुवात करू असा इशारा विवेक पंडीत यांनी दिला आहे.