शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जिओ,बच्चो मरो हेच सरकारचे नवे धोरण - विवेक पंडित

By admin | Updated: September 14, 2016 13:48 IST

आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्याने हजारो बालकं कुपोषणांने त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत आहेत.

ऑनलाइन लोकमत
मोखाडा, दि. १४ - आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्याने हजारो बालकं कुपोषणांने त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत आहेत. असे असताना हे सरकार मात्र स्मार्ट आणि डिजिटल इंडिया सारखे उपक्रम प्राध्यान्य कामावर घेऊन भांडवलदारांचे हिताचे बनले आहे. 
नुकताच रिलायन्स जिओ (JIO) च्या जाहिरतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो प्रसिद्ध झाला होता. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी संताप व्यक्त केला. नुकताच राज्याच्या आदिवासी विकास मंत्री यांच्या गावातच एका कुपोषित मुलीचा मृत्यू झाला. रिलायंस जिओ(JIO) और बच्चो मरो असेच सरकारचे धोरण असल्याची सडेतोड टीका विवेक पंडित यांनी केली.
पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे सत्र अजूनही थांबलेले नाही. मोखाड्यातील सागर वाघ  आणि ईश्वर सवरा यांच्या  मृत्यूची दुर्दैवी घटना ताजी असतानाच नंतर नुकताच वाडा शहरानाजीक  पेठरंजणी या पाड्यात राहणाऱ्या एक मुलीचा कुपोषणाने दुर्दैवी अंत झाला. 
विशेष म्हणजे याच वाडा शहरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे निवासस्थान आहे. या वर्षभरात पालघर जिल्ह्यात 600 बालमृत्यू झाले आहेत त्यातील अर्ध्याहून अधिक बालमृत्यू हे सवरा यांच्या मतदारसंघातील आहेत. याबाबत वारंवार आंदोलन आणि मागण्या होऊनही सवरा यांनी कानावर हात दिले आहेत. 
आता सावरा यांच्याकडून जनतेच्या कोणत्याही  अपेक्षा उरल्या नसल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले. कुपोषणाच्या भयाण वास्तवाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रत्यक्ष कल्पना देऊनही त्यांच्याकडूनहि अपेक्षाभंग झाल्याची खंत पंडित यांनी व्यक्त केली. 
 हे सरकार भांडवलदारधार्जिणे झाले असून  गरिबांच्या वेदनेच्या संवेदना या सरकार मध्ये शिल्लक नसल्याचा आरोप पंडित यांनी  केला.  पंडित यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले असून अजूनही वेळ गेली नसल्याचे सांगितले आहे, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक कार्यक्रमाची अजून काही काळ वाट पाहू. त्यानंतरही सरकारच्या संवेदना जागृत झाल्या नाही तर अत्यंत आंदोलनास सुरुवात करू असा इशारा विवेक पंडीत यांनी दिला आहे.