शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

बदलापूर गाड्यांचे थांबे कमी करा

By admin | Updated: August 13, 2016 03:57 IST

मुंबईहून बदलापूर-कर्जतला येणाऱ्या गाड्यांना ठाणे-डोंबिवलीत थांबा देऊ नये, प्रवाशांची वाढलेली संख्या विचारात घेऊन त्या प्रमाणात बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवावी,

बदलापूर : मुंबईहून बदलापूर-कर्जतला येणाऱ्या गाड्यांना ठाणे-डोंबिवलीत थांबा देऊ नये, प्रवाशांची वाढलेली संख्या विचारात घेऊन त्या प्रमाणात बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवावी, गर्दीच्या वेळी दोन गाड्यांमधील अंतर कमी करावे, बदलापूरहून सुटणाऱ्या गाड्यांत उल्हासनगर आणि अंबरनाथहून बसून येणाऱ्या प्रवाशांना रोखावे, गाड्यांना कोणत्याही कारणाने विलंब होत असेल, तर त्याची माहिती लागलीच उद्घोषणेच्या माध्यमातून द्यावी... या वरवर साध्या वाटणाऱ्या पण प्रवाशांचा अंत पाहणाऱ्या मागण्या शुक्रवारी डीआरएमसमोर मांडण्यात आल्या.मेगाब्लॉकच्या दिवशी तांत्रिक कामांसोबत रेल्वे गाड्यांचीही दुरुस्ती करावी, सकाळी ८.११ ची लोकल फलाट क्रमांक-३ ऐवजी क्रमांक-१ वर आणावी, कमी सीट असलेल्या लोकल बदलापूर-कर्जतसारख्या लांबच्या प्रवासासाठी सोडू नयेत, बदलापूर स्थानकात शेड उभारावी, कर्जत दिशेकडे पादचारी पूल उभारावा, गर्दीच्या वेळेत लोकलला आडव्या येणाऱ्या एक्स्प्रेस आणि मालगाड्यांना मार्ग देऊ नये, हे मुद्देही मांडण्यात आले. या तासाभराच्या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांचा प्रतिसाद थंड-पुरेसा नसल्याने प्रवाशांचे प्रतिनिधी आक्रमक झाले. त्यामुळे डीआरएम अमिताभ ओझा यांनी सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी १९ आॅगस्टला बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच या बैठकीला केवळ प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींना न बोलवता प्रवाशांच्या प्रतिनिधींनाही संधी देण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले.आंदोलन करणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिनिधींपैकी अश्विनी सावंत, सविता दूधवडकर, शिल्पा पाटकर, जयश्री शिंदे, रिगल गजबी, प्रज्ञा गायकवाड यांच्यासह अनेक तरुणांनी या चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)