शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रेंगाळलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:33 IST

मीरा-भार्इंदर पालिका क्षेत्रात शेकडो इमारती धोकादायक अवस्थेत असून त्यातील काही पडल्या, तर काही जमीनदोस्त करण्यात आल्या. परंतु, त्यांचा पुनर्विकास राजकीय साठमाºयांमध्ये अडकल्याने शेकडो कुटुंबे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका क्षेत्रात शेकडो इमारती धोकादायक अवस्थेत असून त्यातील काही पडल्या, तर काही जमीनदोस्त करण्यात आल्या. परंतु, त्यांचा पुनर्विकास राजकीय साठमाºयांमध्ये अडकल्याने शेकडो कुटुंबे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न २०१२ मधील ‘लता अपार्टमेंट’ या इमारतीच्या दुर्घटनेमुळे चव्हाट्यावर आला. त्या वेळी धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या करण्याची जोरदार मोहीम पालिकेने सुरू केली. केवळ नोटिसा पाठवून कारवाईचा बडगा प्रशासनाकडून उगारला गेला. पालिकेच्या नोटिसांना इमारतींमधील रहिवाशांनी भीक न घालता जीव मुठीत धरून धोकादायक अवस्थेतील इमारतींमध्येच वास्तव्य केले. यापूर्वी अशा इमारतींना पालिका दुरुस्तीच्या परवानग्या देऊन त्यांची तात्पुरती देखभाल करत होती. परंतु, २०१२ मधील त्या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनात अतिरिक्त एफएसआयचा अडसर ठरू लागला. ३० ते ४० वर्षांपूर्वी इमारती बांधताना विकासकांनी मंजूर एफएसआयसह बेकायदा अतिरिक्त एफएसआयचा वापर केला आहे. त्यामुळे धोकादायक ठरलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाकरिता अतिरिक्त एफएसआयच शिल्लक नसल्याने विकासकांना त्यामध्ये रस नाही. परिणामी, पुनर्विकास न झालेल्या अनेक इमारती जमीनदोस्त केल्या गेल्या. तत्पूर्वी या समस्येवर मार्ग काढण्यासाठी २००९-१० मध्ये प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता इमारतीच्या बांधकामाच्या वेळी वापरण्यात आलेला एफएसआय अधिक १ एफएसआयचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. परंतु, तो राज्य सरकारने अद्यापही मंजूर केलेला नाही. यानंतर, धोकादायक इमारतींकरिता सामूहिक विकास योजना सरकारने जाहीर केली. एकापेक्षा अधिक धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची ही योजना अत्यंत क्लिष्ट व तांत्रिक अडचणीची ठरू लागल्याने बहुतांश खाजगी विकासकांनी ती अमान्य केली आहे. शहरातील शेकडो इमारतींमधील रहिवासी पुनर्विकासाच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतानाच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोकादायक इमारतींची वयोमर्यादा ३० ते ३५ वर्षांवरून कमी करून २५ वर्षे केली. परंतु, एफएसआयच शिल्लक नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास न आल्याने केवळ धोकादायक इमारतींचे वय कमी करण्याचे दाखवण्यात आलेले गाजर कितपत प्रभावी ठरणार, हे येत्या पालिका निवडणुकीतील मतदानावरच निर्भर राहणार आहे. शहरात सध्या पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आश्वासनांची खैरात सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. मात्र, त्यात इमारतींच्या पुनर्विकासासाठी अतिरिक्त एफएसआय दिल्याखेरीज प्रश्न सुटणार नाही. तसेच ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या व धोकादायक अवस्थेतील काही इमारती तिवर क्षेत्रात बांधल्याचे २००० मधील पर्यावरणवादी आराखड्यात स्पष्ट झाल्याने त्यांचा विकास तर अशक्यप्राय झाला आहे. अलीकडेच राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला. त्यातही तिवर क्षेत्रातील बांधकामांचा विचार करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.तिवर क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास पर्यावरण विभागाच्या परवानगीने होणार नसल्याने त्यातील रहिवासी छप्पर जाणार, या भीतीने हवालदिल झाले आहेत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना एमएमआरडीएच्या घरकुल योजनेत सामावून घेण्याचा ठराव मंजूर केला. सहाशेहून अधिक घरे मिळाली असली, तरी बहुतांश घरात ‘बीएसयूपी’तील लाभार्थी राहत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीतील रहिवासी वाºयावर आहेत.