शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

रेडी रेकनरचा दिलासा, पण टीडीआर धोरणही हवे

By admin | Updated: April 4, 2016 02:00 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या रेडी रेकनर दरात फारशी वाढ नसल्याचा ठाणे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळेल आणि या क्षेत्रातील मंदीवर हा माफक उतारा ठरेल

कल्याण : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या रेडी रेकनर दरात फारशी वाढ नसल्याचा ठाणे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळेल आणि या क्षेत्रातील मंदीवर हा माफक उतारा ठरेल, अशी भावना बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, राज्य सरकारचे नवे टीडीआर धोरण लवकर अमलात यायला हवे. अनधिकृत-धोकादायक इमारतींना दिलेल्या दिलाशाच्या घोषणा लवकरच प्रत्यक्षात याव्या, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी १० ते १५ टक्के रेडी रेकनरचे दर राज्य सरकार वाढवते. यंदा मात्र सरासरी सात टक्के वाढ आहे. गृहबांधणी क्षेत्रातील मंदी पाहता राज्य सरकारने हे दर तीन महिने उशिरा वाढवले आहेत. कोकण विभागीय आणि एमएमआर रिजनसाठी करण्यात आलेली ही वाढ मर्यादित आहे. त्यामुळे त्याचे बिल्डरांनी स्वागतच केल्याची माहिती ‘एमसीएचआय’च्या कार्यकारी मंडळातील सदस्य राजू जाधव यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीत हा दर पाच टक्के वाढला आहे. मुळात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात घनकचरा प्रकल्पांच्या दिरंगाईमुळे उच्च न्यायालयाने नव्या बांधकामांवर बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीतील बिल्डरांचे नवे प्रकल्प मंजूर झालेले नाहीत. तेथील बिल्डर आधीच अडचणीत आले आहे. त्यातच रेडी रेकनरची दरवाढ १० ते १५ टक्के झाली असती तर त्याचा फटका बांधकाम व्यवसायाला बसला असता. कोकण विभागातील पाच जिल्हे ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी यांच्यासह एमएमआरडीएच्या मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रेडी रेकनरचा दर फारसा वाढलेला नाही. त्यामुळे घर खरेदी केल्यावर ग्राहकाला स्टॅम्प ड्युटीही कमी भरावी लागेल. राज्य सरकारने नुकतेच टीडीआरचे नवे धोरण जाहीर केले आहे. पण, त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून होत नाही. ती झाल्यास घरे स्वस्त होऊ शकतात. बांधकाम क्षेत्रातील मंदी कमी होण्यास त्यामुळे थोडीफार मदत होईल, असे बिल्डरांचे म्हणणे आहे. डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक राहुल दामले यांनी सांगितले, भाजपा सरकारने बांधकाम क्षेत्रातील मंदीचे भान ठेवून दरवर्षीप्रमाणे रेडी रेकनरचे दर लागू न करता त्यात मर्यादित स्वरूपात दरवाढ केली आहे. तसेच वेगवेगळ्या शहरांची वेगवेगळी पार्श्वभूमी लक्षात घेता तेथील वाढही वेगवेगळी आहे. घरबांंधणी आणि जमीन विक्री क्षेत्रात मंदी सुरू आहे. रेडी रेकनरचा दर कमी झाला असला तरी घरे फार स्वस्त होणार नाहीत. प्रतिचौरस फुटामागे ५०० रुपयांनी दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेडी रेकनरचे दर वाढले नसले, तरी बांधकाम क्षेत्रातील मंदी कमी होईल, असे नाही. आधीच महापालिका क्षेत्रात नव्या बांधकामांवर न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात अशीही मंदीच आहे.