शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जिल्ह्यात पावसाळी पर्यटनबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:50 IST

ठाणो : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील सर्व धबधबे, धरणे, तलाव, गडकोट-किल्ले अशा पर्यटनस्थळी ...

ठाणो : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील सर्व धबधबे, धरणे, तलाव, गडकोट-किल्ले अशा पर्यटनस्थळी एकत्र येण्यास मनाई आदेश जारी केला आहे. त्यामुळे यंदाही ठाणेकरांना जिल्ह्यातील पावसाळ्यात त्यांच्याजवळच्या पर्यटनस्थळी आनंद घेता येणार नसल्याचे उघड झाले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काही अंशी कमी होत आहे. त्यास अनुसरून सध्याच्या संचारबंदीतील निर्बंधही शिथिल केले आहेत. याचा गैरफायदा घेऊन पर्यटकांची धबधबे, तलाव, गडकिल्ले, माळशेज घाटासारख्या पर्यटनस्थळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हा मनाई आदेश जारी केला आहे. सार्वजनिक व खासगी जागेत एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादींमुळे या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने तत्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ही मनाई केली आहे.

जिल्ह्यात मान्सून कालावधीत मोठ्या संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्या ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे शक्य होणार नाही. परिणामी, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. यावर मात करण्यासह पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

....

- ही आहेत जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

* ठाणे तालुक्यातील येऊर धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेती बंदर, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा आदी पर्यटनस्थळी यंदाही मनाई आहे.

* मुरबाड तालुक्यात सिद्धगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे डॅम, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली, गोरखगड, सिंगापूर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेंबे ही स्थळे आहेत.

* शहापूर तालुक्यात भातसा धरण, कुंडन दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोका धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब) सापगाव नदीकिनारी, कळंबे नदीकिनारा, कसारा येथील सर्व धबधबे ही स्थळे आहेत.

* कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर,गणेश घाट चौपाटी ही स्थळे आहेत.

* भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणोशपुरी नदी परिसर ही स्थळे आहेत.

* अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वर्हाडे, दहिवली, मळीचीवाडी आदी स्थळे.

.......