शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जिल्ह्यात २२ कोटींच्या ६९ किमी रस्त्यांना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : राज्यातील जिल्ह्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : राज्यातील जिल्ह्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात वाढत आड्त. अतिवृष्टी व पुराने तब्बल २२ कोटी ३२ लाख रुपये किमतीचे रस्ते वाहून गेले आहेत. यामध्ये ६८.६४५ किमीच्या इतर जिल्हा मार्गांसह (ओडीआर) गाव रस्त्यांचा (व्हीआर) समावेश आहे, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

मुंबई महानगराला लागून असलेला ठाणो जिल्हा चार हजार ५०० चौ. किमीमध्ये विस्तारला आहे. मुंबई गाठण्यासाठी आणि मुंबई बाहेर पडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. पण, या रस्त्यांवरील सततची वाहतूक, त्यात वाहनांची कोंडी आदींसह गावपाडे, खेड्यांना जोडणारे रस्ते जीवघेणे ठरत आहेत. यंदा आतापर्यंत एक हजार ४६७ मिमी. पाऊस पडला आहे. जवळजवळ ८५ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख्य जिल्हा मार्गांसह जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील तीन हजार १०० किमी.च्या रस्त्यांपैकी बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे. तर अतिवृष्टीच्या कालावधीत ६९ किमी. रस्ते पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात सध्या ६४०.३९५ किमी.चे इतर जिल्हा मार्ग आहेत. तर गाव रस्ते दोन हजार १७६.७५ किमी.चे आहेत. या एकूण तीन हजार १०० किमी.च्या ६० किमी. रस्ते खराब होऊन वाहून गेले आहेत. तब्बल २२ कोटी ३२ लाख ५० हजार रुपये किमतीचे रस्ते वाहून गेल्याचा फटका जिल्हा परिषदेला बसला आहे. आता नव्या दरानुसार त्यासाठी २६ कोटी १३ लाख रुपये खर्च करून या रस्त्यांना दुरुस्त करावे लागणार आहे. या निधीसाठी आता जिल्हा परिषदेकडून एनडीआरएफच्या निधीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तो प्राप्त झाल्यानंतरच जिल्ह्यातील या गावखेड्य़ाच्या रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.

सर्वाधिक रस्त्यांची समस्या कल्याण तालुक्यात

जिल्ह्यात सर्वाधिक रस्त्यांची समस्या कल्याण तालुक्याला भेडसावत आहे. या तालुक्यातील २१ किमीच्या एक कोटी ८० लाख रुपये किमतीच्या रस्त्यांचा फटका जिल्हा परिषदेला बसला आहे. या रस्त्यांसाठी आता दोन कोटी ५० लाखांच्या निधीची गरज आहे. या खालोखाल भिवंडीच्या १८.७३ किमी.च्या रस्त्यांचा समावेश आहे. सात कोटी ९० लाख किमतीच्या या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी ९० लाखांची मागणी आहे. शहापूर तालुक्यामधील १६.३० किमीचा आठ कोटी ९१ लाख किमतीच्या रस्त्याचा फटका बसला आहे. आता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ८६ लाखांची मागणी होत आहे. मुरबाड तालुक्यातही १२.६१ किमीच्या रस्त्यांना फटका बसला आहे. या तीन कोटी ७१ लाख किमतीच्या रस्त्यांसाठी तीन कोटी ८७ लाखांच्या निधीची गरज आता जिल्हा परिषदेला आहे. या निधीच्या प्राप्तीनंतर जिल्ह्यातील हे रस्ते नव्या रूपात पाहायला मिळणार आहेत.

....