शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २२ कोटींच्या ६९ किमी रस्त्यांना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : राज्यातील जिल्ह्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : राज्यातील जिल्ह्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात वाढत आड्त. अतिवृष्टी व पुराने तब्बल २२ कोटी ३२ लाख रुपये किमतीचे रस्ते वाहून गेले आहेत. यामध्ये ६८.६४५ किमीच्या इतर जिल्हा मार्गांसह (ओडीआर) गाव रस्त्यांचा (व्हीआर) समावेश आहे, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

मुंबई महानगराला लागून असलेला ठाणो जिल्हा चार हजार ५०० चौ. किमीमध्ये विस्तारला आहे. मुंबई गाठण्यासाठी आणि मुंबई बाहेर पडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. पण, या रस्त्यांवरील सततची वाहतूक, त्यात वाहनांची कोंडी आदींसह गावपाडे, खेड्यांना जोडणारे रस्ते जीवघेणे ठरत आहेत. यंदा आतापर्यंत एक हजार ४६७ मिमी. पाऊस पडला आहे. जवळजवळ ८५ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख्य जिल्हा मार्गांसह जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील तीन हजार १०० किमी.च्या रस्त्यांपैकी बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे. तर अतिवृष्टीच्या कालावधीत ६९ किमी. रस्ते पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात सध्या ६४०.३९५ किमी.चे इतर जिल्हा मार्ग आहेत. तर गाव रस्ते दोन हजार १७६.७५ किमी.चे आहेत. या एकूण तीन हजार १०० किमी.च्या ६० किमी. रस्ते खराब होऊन वाहून गेले आहेत. तब्बल २२ कोटी ३२ लाख ५० हजार रुपये किमतीचे रस्ते वाहून गेल्याचा फटका जिल्हा परिषदेला बसला आहे. आता नव्या दरानुसार त्यासाठी २६ कोटी १३ लाख रुपये खर्च करून या रस्त्यांना दुरुस्त करावे लागणार आहे. या निधीसाठी आता जिल्हा परिषदेकडून एनडीआरएफच्या निधीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तो प्राप्त झाल्यानंतरच जिल्ह्यातील या गावखेड्य़ाच्या रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.

सर्वाधिक रस्त्यांची समस्या कल्याण तालुक्यात

जिल्ह्यात सर्वाधिक रस्त्यांची समस्या कल्याण तालुक्याला भेडसावत आहे. या तालुक्यातील २१ किमीच्या एक कोटी ८० लाख रुपये किमतीच्या रस्त्यांचा फटका जिल्हा परिषदेला बसला आहे. या रस्त्यांसाठी आता दोन कोटी ५० लाखांच्या निधीची गरज आहे. या खालोखाल भिवंडीच्या १८.७३ किमी.च्या रस्त्यांचा समावेश आहे. सात कोटी ९० लाख किमतीच्या या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी ९० लाखांची मागणी आहे. शहापूर तालुक्यामधील १६.३० किमीचा आठ कोटी ९१ लाख किमतीच्या रस्त्याचा फटका बसला आहे. आता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ८६ लाखांची मागणी होत आहे. मुरबाड तालुक्यातही १२.६१ किमीच्या रस्त्यांना फटका बसला आहे. या तीन कोटी ७१ लाख किमतीच्या रस्त्यांसाठी तीन कोटी ८७ लाखांच्या निधीची गरज आता जिल्हा परिषदेला आहे. या निधीच्या प्राप्तीनंतर जिल्ह्यातील हे रस्ते नव्या रूपात पाहायला मिळणार आहेत.

....