शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लसीचे टोकन मिळवण्यासाठी रात्रीपासून रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

डोंबिवली : महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्रे वारंवार बंद ठेवावी ...

डोंबिवली : महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्रे वारंवार बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे उद्यावर अवलंबून न राहता आजच लस मिळावी या प्रयत्नात नागरिक आहेत. साठा उपलब्ध झाल्याचा संदेश व्हायरल होताच नागरिक टोकन घेण्यासाठी मध्यरात्रीपासूनच केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. सोमवारी बहुतांश ठिकाणी लसीचा दुसरा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले होते.

लसीसाठी तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही लसीकरण केंद्राबाहेर ताटकळत आहेत. नागरिक जास्त येत असल्याने टोकन कमी पडू लागले आहेत. रात्री रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार टोकन मिळाले. मात्र सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांना माघारी जावे लागत आहे. ज्यांना टोकन नाही मिळाले, त्या ठिकाणी शाब्दिक चकमकीचे प्रकारही वाढले आहेत. महिनाभरापूर्वी इस्पितळात बेड, ऑक्सिजन, औषध यासाठी करावी लागणारी धावपळ आता लसीकरणावर येऊन ठेपली आहे. नागरिकांना जास्त वेळ बसून ठेवण्यापेक्षा टोकन देऊन त्या त्या वेळेनुसार लसीकरण करण्याकडे काही केंद्रांचा कल आहे.

गेल्या दोन आठवड्यांत लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत असल्याने केंद्रांवर गर्दी होत आहे. लस उपलब्ध होईल की नाही, याचा भरवसा नसल्याने नागरिक टोकनसाठी रात्रीपासूनच रांगा लावत आहेत. डोंबिवलीतील शिवमंदिराजवळील शाळेतील केंद्रावर सोमवारी टोकनमुळे काही काळ गोंधळ उडाला होता. या ठिकाणी काही नागरिक रात्री १ वाजल्यापासून रांगेत उभे होते. काहींना रात्री तर काहींना सकाळी टोकन दिल्याची टीका काही नागरिकांनी केली. टोकन नेमकं देतात तरी कधी, असा सवालही उपस्थित करण्यात आला. टिळकनगरच्या केंद्रावरही अशीच स्थिती होती. येथे एकूण ३०० नागरिकांसाठी लस होती. त्यापैकी काही दिवसांपासून वेटिंगवर असलेल्या २९८ जणांना बोलावण्यात आले. उर्वरित अवघ्या दोन डोससाठी आयोजकांना नागरिकांनी भंडावून सोडल्याचे निदर्शनास आले.

--

आम्ही केंद्रावर नागरिकांना नेहमी मदत करतो. मात्र लस उपलब्ध होते, तेव्हा सकाळी ६ ते ७ या वेळेतच टोकन वाटले जाते. अलीकडे साठा कमी असल्याने लस मिळते की नाही, या विवंचनेत नागरिक रात्रीपासूनच टोकनसाठी रांगा लावत आहेत.

- सागर जेधे, शिवसेना पदाधिकारी

-----------

बरेच दिवसांनी लस आली. त्यात जे आधीपासून रांग लावून माघारी गेले त्यांना आम्ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर बोलावले. जे वेळेवर आले त्यांना परत पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता. महापालिका प्रशासनाने जास्तीच्या लस उपलब्ध करून द्यायला हव्यात.

- राजन आभाळे, माजी नगरसेवक, टिळकनगर, भाजप