शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाचार कोटी खर्चूनही प्रकल्प पीडितांच्या पाण्याचा प्रश्न भिजतच

By admin | Updated: August 30, 2016 02:25 IST

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडितांचे पुनर्वसन बाबतचा विषय हा न्यायालयात असला तरी ४ कोटी २० लाख खर्चूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही राज्य शासनाला सोडविण्यात अपयश

पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडितांचे पुनर्वसन बाबतचा विषय हा न्यायालयात असला तरी ४ कोटी २० लाख खर्चूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही राज्य शासनाला सोडविण्यात अपयश येत असल्याने त्यांचे अनेक प्रश्न सोडविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती करण्याची वेळ राज्यपाल राम नाईक यांच्यावर आली आहे.देशातील पहिला १ आणि २ अणुप्रकल्प सन १९६७ साली तारापूर येथे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत उभारण्यात आले. त्या नंतर अणु ऊर्जा प्रकल्प ३ आणि ४ च्या उभारणीसाठी अक्करपट्टी आणि पोफरण ही गावे स्थलांतरित करण्यात आली. या प्रकल्पाचे राम नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन ही करण्यात आले होते. आघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने न पाळता त्यांना बळजबरीने हलविण्यात आले असे राम नाईकांनी सांगितले. त्या मुळे आपल्या अधिकारासाठी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. आता पर्यंत १२ वर्षाच्या कालावधीत ६० पेक्षा अधिक वेळा सुनावण्या झाल्या आहेत. मात्र शासनाच्या पुनर्वसन खात्याचे अधिकारी या प्रकरणात लक्ष देत नसल्याने प्रकल्पग्रस्त पिण्याच्या पाण्यासारख्या साध्या सोयीपासून आज वंचित आहेत. अशा वेळी केंद्रात आणि राज्यात राम नाईकांचा भाजपा हा प्रमुख पक्ष दोन वर्षापासून सत्तेत असतांना प्रकल्पग्रस्तांवर अशी पाळी का ओढवली जाते आणि हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना का विनंती करावी लागते ? हा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत.तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडितांचे पुनर्वसन हा राम नाईक यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून १२५० प्रकल्प पीडित ग्रामस्थ आपल्या अधिकारासाठी सन २००४ पासून उच्च न्यायालयात गेले असताना राम नाईक ही त्यांच्या याचिकेत सहभागी झाले होते. मात्र आता ते उत्तर प्रदेश चे राज्यपाल असल्याने घटनात्मक जबाबदारी मुळे आपण न्यायालयीन कामात सहभागी होऊ शकत नाही असे सांगून ते तूर्तास बाजूला झाले आहेत. शासनाने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या घरांना अनेक ठिकाणी तडे गेले असून पाणी,गटारे,आरोग्य सेवे सारख्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठीही प्रकल्पग्रस्तांना संघर्ष करावा लागत आहे हे खूपच वेदनादायी आहे. प्रकल्प उभारतांना स्थानिकांनी दाखविलेले मोठे मन सरकारने विसरु नये.(वार्ताहर)