शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

उल्हासनगरात भाडेतत्त्वावरील मालमत्तेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : मालमत्ता भाडेतत्त्वावरील कर रद्द व २०१५ पूर्वीच्या मालमत्ताधारकांना दुप्पट कर दंड महापालिका आकारात असल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : मालमत्ता भाडेतत्त्वावरील कर रद्द व २०१५ पूर्वीच्या मालमत्ताधारकांना दुप्पट कर दंड महापालिका आकारात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला आहे. अशा करामुळे शहराचे नुकसान होत असून तो रद्द करण्याची मागणी करून त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभाग नेहमी वादात सापडत असून यापूर्वी तत्कालीन उपायुक्तसह अन्य जनावर गुन्हे दाखल झाले होते. शहरातील मालमत्ता भाडे तत्वावरील कर रद्द व २०१५ पूर्वीचे मालमत्ता धारकांना दुप्पट कर दंड म्हणून लावण्यात आला. तो रद्द करण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा काँग्रेसचे शहाराध्यक्ष रोहित साळवे यांनी दिला. ज्या मालमत्ता भाडे तत्वावर दिल्या गेल्या आहेत, त्यांच्या कराची रक्कम ही खूप जास्त (७३.५ टक्के) असून ती अन्यायकारक आहे. या जास्त कराच्या वसुलीमुळे शहरात असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्या यांनी यापूर्वीच शहर सोडले, असे साळवे यांनी निवेदनात म्हटले. तसेच बँका, बँक एटीएम आणि इतर कंपन्या शहर सोडण्याच्या तयारीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा भाडेतत्त्वावरील मालमत्ता कराचे पैसे पालिकेच्या तिजोरीत जमा होत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

अन्यायकारक व शहराच्या विकासात बाधा आणणाऱ्या मालमत्ता भाडेतत्त्वावरील कर रद्द व्हावा, यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आमरण उपोषण करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित साळवे यांनी दिली. ज्या मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्या आहेत त्यावरील ७३.५ टक्के हा अन्यायकारक कर रद्द करावा, २०१५ पूर्वीची घरे नियमित करण्याचा जो शासन निर्णय आहे. त्याची अमलबजावणी करत २०१५ सालीच्या पूर्वीचे सर्व मालमत्ताधारकांना जो दुप्पट कर दंड म्हणून लावण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा. वर्षानुवर्षे कर विभागात एकाच पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी, आदी अनेक मागण्या निवेदनात केल्या आहेत. पक्षाच्या वतीने २२ सप्टेंबर रोजी महापालिकेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मालमत्ता कर विभागाचे करनिर्धारक जेठानंद यांच्याशी संपर्क साधला असता झाला नाही.