शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पाणीयोजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी तरतूद हवी

By admin | Updated: March 10, 2017 04:11 IST

ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी मिळते. परंतु गळती, पाणी चोरी, आणि नियोजनाच्या अभावामुळे मुबलक पाणी असूनही काही भागांना वणवण भटकावे लागते.

ठाणे : ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी मिळते. परंतु गळती, पाणी चोरी, आणि नियोजनाच्या अभावामुळे मुबलक पाणी असूनही काही भागांना वणवण भटकावे लागते. ते रोखायचे असेल तर पाणी योजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी अपेक्षा ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे माजी मुख्य अधिकारी गिरीश मेहेंदळे यांनी व्यक्त केले.गळती रोखावी, मीटर पध्दतीने पाणीपुरवठा सुरु करावा. वॉटर, एनर्जी आॅडिटची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, असा आग्रहही त्यांनी धरला. पालिकेने पाणीबिलाची वसुली मीटरप्रमाणेच करावी. मीटर पद्धतीमुळे पाण्याच्या नियोजनास मदत होईल. याशिवाय पाणी येते किती, वापरले जाते किती, याचे नोंद सुरू करावी. एकूणच पाण्याचे मोजमाप होणे गरजेचे असण्यावर त्यांचा भर होता. पाणी बिलाच्या वसुलीचे कामही पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून न करता किंवा पाणी मीटरचे काम, वॉटर आॅडिट, एनर्जी आॅडिट हे पालिकेकडून न करता ते आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून केल्यास त्यामुळे उत्पन्न वाढेल; शिवाय पाण्याच्या नियोजनास मदत होईल, असे मेहेंदळे म्हणाले. पाणीपुरवठा विभागाला देखभाल दुरुस्तीसाठी निधी लागतो. त्याची तरतूद अर्थसंकल्पात नसते. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी त्यासाठी भरीव तरतूद केल्यास दुरुस्तीची कामे वेळेत होऊन गळतीचे प्रमाण रोखण्यास मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. धरणाचा प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळत पडला आहे. त्याचा वाढलेला खर्च पाहता आता पालिकेला हे धरण बांधणे शक्य नाही. त्यामुळे हे काम राज्य सरकारमार्फतच करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी मांडले. पाणीपुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची उणीव भरुन काढण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी) पुरवठ्याचे नियोजन हवे : पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन हवे. कोणत्या भागाला महत्व दिले पाहिजे, कोणत्या भागाला कमी महत्व दिले जाणे अपेक्षित आहे, याचाही अभ्यास पुरवठ्यावेळी करणे गरजेचे आहे. या सर्वांसाठी निधी मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून फक्त उत्पन्नाची आशा न ठेवता, त्यांच्यासाठी विशेष तरतूदही करणे अपेक्षित आहे, असा आग्रह त्यांनी धरला.