शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
3
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
4
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
5
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
6
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
7
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
8
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
9
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
10
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
12
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
13
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
14
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
15
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
16
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
17
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
18
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
19
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
20
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

पाणीयोजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी तरतूद हवी

By admin | Updated: March 10, 2017 04:11 IST

ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी मिळते. परंतु गळती, पाणी चोरी, आणि नियोजनाच्या अभावामुळे मुबलक पाणी असूनही काही भागांना वणवण भटकावे लागते.

ठाणे : ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी मिळते. परंतु गळती, पाणी चोरी, आणि नियोजनाच्या अभावामुळे मुबलक पाणी असूनही काही भागांना वणवण भटकावे लागते. ते रोखायचे असेल तर पाणी योजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी अपेक्षा ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे माजी मुख्य अधिकारी गिरीश मेहेंदळे यांनी व्यक्त केले.गळती रोखावी, मीटर पध्दतीने पाणीपुरवठा सुरु करावा. वॉटर, एनर्जी आॅडिटची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, असा आग्रहही त्यांनी धरला. पालिकेने पाणीबिलाची वसुली मीटरप्रमाणेच करावी. मीटर पद्धतीमुळे पाण्याच्या नियोजनास मदत होईल. याशिवाय पाणी येते किती, वापरले जाते किती, याचे नोंद सुरू करावी. एकूणच पाण्याचे मोजमाप होणे गरजेचे असण्यावर त्यांचा भर होता. पाणी बिलाच्या वसुलीचे कामही पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून न करता किंवा पाणी मीटरचे काम, वॉटर आॅडिट, एनर्जी आॅडिट हे पालिकेकडून न करता ते आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून केल्यास त्यामुळे उत्पन्न वाढेल; शिवाय पाण्याच्या नियोजनास मदत होईल, असे मेहेंदळे म्हणाले. पाणीपुरवठा विभागाला देखभाल दुरुस्तीसाठी निधी लागतो. त्याची तरतूद अर्थसंकल्पात नसते. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी त्यासाठी भरीव तरतूद केल्यास दुरुस्तीची कामे वेळेत होऊन गळतीचे प्रमाण रोखण्यास मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. धरणाचा प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळत पडला आहे. त्याचा वाढलेला खर्च पाहता आता पालिकेला हे धरण बांधणे शक्य नाही. त्यामुळे हे काम राज्य सरकारमार्फतच करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी मांडले. पाणीपुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची उणीव भरुन काढण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी) पुरवठ्याचे नियोजन हवे : पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन हवे. कोणत्या भागाला महत्व दिले पाहिजे, कोणत्या भागाला कमी महत्व दिले जाणे अपेक्षित आहे, याचाही अभ्यास पुरवठ्यावेळी करणे गरजेचे आहे. या सर्वांसाठी निधी मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून फक्त उत्पन्नाची आशा न ठेवता, त्यांच्यासाठी विशेष तरतूदही करणे अपेक्षित आहे, असा आग्रह त्यांनी धरला.