शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

रक्षक हटविले, पेल्हार असुरक्षित

By admin | Updated: March 1, 2016 02:01 IST

नालासोपारा आणि वसई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणावरील सुरक्षा रक्षक हटवण्यात आल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

शशी करपे,  वसईनालासोपारा आणि वसई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणावरील सुरक्षा रक्षक हटवण्यात आल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. धरणात जिलेटीनचा स्फोट घडवून खुलेआम मासेमारी सुरु आहे. या परिसरात दारुच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत. कपल्सचा रोमान्स वाढला आहे. तबेल्यांनी अतिक्रमण करून धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे गोडाऊन बनवले आहे. यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली असून शहराच्या पाणीपुरवठ्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेले मातीचे पाझर धरण चारही नगरपालिकांनी २००१ साली आपल्या ताब्यात घेऊन त्याचे मजबूतीकरण केले होते. या धरणातून नालासोपारा शहराला दररोज ७.२ एमएलडी तर वसई शहराला एकदिवस आड ७.२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पालिकेने ठेका पद्धतीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर धरणावरील सहा सुरक्षा रक्षक काढून टाकण्यात आले आहेत. त्यानंतर याठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नाही. नालासोपारा शहराची लोकसंख्या तीन लाखाच्या घरात आहे, तर वसईची लोकसंख्या दोन लाखाच्या घरात आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने समाजकंटकांनी जर धरणाच्या पाण्यातूनं विषबाधा घडवून आणल्यास लाखो लोकांचा जीव धोक्यात येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. धरणाचे मजबूतीकरण करण्यात आले असले तरी मासेमारी करणारे मोठ्या प्रमाणावर पात्रात जिलेटीनचे स्फोट घडवून आणत असल्याने त्याच्या हादऱ्याने धरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे जिलेटीनचे स्फोट घडवले जात असताना दुसरीकडे आंघोळ, गुरे-ढोरे आणि धुणी भांडी धुतली जात असल्याने धरणातील पिण्याचे पाणी दूषित होत असून लाखो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो आहे. या परिसरात आता पर्यटनाच्या नावाखाली खुलेआम पार्ट्या झडू लागल्या आहेत. कुणी हटकणारे नसल्याने या परीसरात तरुणाईच्या रोमान्सला ऊत आला आहे. धरणाच्या परिसरात शेकडो तबेले असून बहुतांशी बेकायदा आहेत. धरण परिसरात ठराविक अंतरावर बोअरवेल खोदण्यास मनाई आहे. असे असताना तबेला मालक शेकडो बोअरवेल मारून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे मूळ पाझर तलाव असलेल्या धरणातील पाणी साठयावर परिणाम होऊन एप्रिल-मे महिन्यात त्यातील पाणीसाठा खूप कमी होत असतो. त्यामुळे नालासोपारा आणि वसई शहरातील पाणी पुरवठयावर परिणाम होऊन लोकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. धरणाचा परिसर तबेल्यातील घाणीने भरून गेलेला असतो. तबेल्यांनी धरणाच्या आणि सरकारी मालकीच्या जागेवरही अतिक्रमण केले आहे. आता धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गवताच्या गंजी टाकून तो व्यापून टाकण्यात आला आहे.