शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

रक्षक हटविले, पेल्हार असुरक्षित

By admin | Updated: March 1, 2016 02:01 IST

नालासोपारा आणि वसई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणावरील सुरक्षा रक्षक हटवण्यात आल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

शशी करपे,  वसईनालासोपारा आणि वसई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणावरील सुरक्षा रक्षक हटवण्यात आल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. धरणात जिलेटीनचा स्फोट घडवून खुलेआम मासेमारी सुरु आहे. या परिसरात दारुच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत. कपल्सचा रोमान्स वाढला आहे. तबेल्यांनी अतिक्रमण करून धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे गोडाऊन बनवले आहे. यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली असून शहराच्या पाणीपुरवठ्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेले मातीचे पाझर धरण चारही नगरपालिकांनी २००१ साली आपल्या ताब्यात घेऊन त्याचे मजबूतीकरण केले होते. या धरणातून नालासोपारा शहराला दररोज ७.२ एमएलडी तर वसई शहराला एकदिवस आड ७.२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पालिकेने ठेका पद्धतीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर धरणावरील सहा सुरक्षा रक्षक काढून टाकण्यात आले आहेत. त्यानंतर याठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नाही. नालासोपारा शहराची लोकसंख्या तीन लाखाच्या घरात आहे, तर वसईची लोकसंख्या दोन लाखाच्या घरात आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने समाजकंटकांनी जर धरणाच्या पाण्यातूनं विषबाधा घडवून आणल्यास लाखो लोकांचा जीव धोक्यात येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. धरणाचे मजबूतीकरण करण्यात आले असले तरी मासेमारी करणारे मोठ्या प्रमाणावर पात्रात जिलेटीनचे स्फोट घडवून आणत असल्याने त्याच्या हादऱ्याने धरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे जिलेटीनचे स्फोट घडवले जात असताना दुसरीकडे आंघोळ, गुरे-ढोरे आणि धुणी भांडी धुतली जात असल्याने धरणातील पिण्याचे पाणी दूषित होत असून लाखो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो आहे. या परिसरात आता पर्यटनाच्या नावाखाली खुलेआम पार्ट्या झडू लागल्या आहेत. कुणी हटकणारे नसल्याने या परीसरात तरुणाईच्या रोमान्सला ऊत आला आहे. धरणाच्या परिसरात शेकडो तबेले असून बहुतांशी बेकायदा आहेत. धरण परिसरात ठराविक अंतरावर बोअरवेल खोदण्यास मनाई आहे. असे असताना तबेला मालक शेकडो बोअरवेल मारून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे मूळ पाझर तलाव असलेल्या धरणातील पाणी साठयावर परिणाम होऊन एप्रिल-मे महिन्यात त्यातील पाणीसाठा खूप कमी होत असतो. त्यामुळे नालासोपारा आणि वसई शहरातील पाणी पुरवठयावर परिणाम होऊन लोकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. धरणाचा परिसर तबेल्यातील घाणीने भरून गेलेला असतो. तबेल्यांनी धरणाच्या आणि सरकारी मालकीच्या जागेवरही अतिक्रमण केले आहे. आता धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गवताच्या गंजी टाकून तो व्यापून टाकण्यात आला आहे.