शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘समृद्धी’च्या भरपाईचे दर फसवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:34 IST

समृद्धी महामार्गासाठी बाजारभावापेक्षा पाचपट दर देऊ असे जरी सरकार सांगत असले तरी सरकारने जाहीर केलेला भाव तसा नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांची

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर/आसनगाव : समृद्धी महामार्गासाठी बाजारभावापेक्षा पाचपट दर देऊ असे जरी सरकार सांगत असले तरी सरकारने जाहीर केलेला भाव तसा नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करते आहे. चर्चेलाही तयार नाही, असा आरोप करत या फसवणूक आणि दडपशाहीविरूद्ध शहापूर तालुक्यात गुरूवारी शेतकऱ्यांनी भर पावसात जेलभरो आंदोलन केले. त्यात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. शेतीची कामे सुरू असतानाही महिलांचा या आंदोलनातील सहभाग लक्षणीय होता. समृद्धी महमार्गासाठी सरकारतर्फे एकेका शेतकऱ्याशी वाटाघाटी करून, दडपशाही पद्धतींने जमिनी घेतल्या जात आहेत. त्याच्या निषेधार्थ संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जेल भरो आंदोलन केले. ‘रद्द करा, रद्द करा; समृद्धी महामार्ग रद्द करा,’ अशा घोषणा देत हाताला काळ््या रिबीनी बांधून शहापूरच्या बाजारपेठेतून आंदोलनकर्ते शहापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यासमोर जमले. तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना निषेधाचे निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. समितीचे समन्वयक बबन हरणे यांची शेतजमीन या महामार्गात जात नसल्याने ते आंदोलनात सहभागी झाले नाहीत. तसेच तालुक्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांना या आंदोलनात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आल्याने स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आंदोलनापासून दूर राहिले. मात्र नंतर सर्वांनी आंदोलकासमोर भूमिका मांडली. जमिनीसाठी पाचपट वाढीव दर जाहीर केले आहेत. ते फसवे आहेत. बाजारभावाएवढीच रक्कम मिळत असेल तर सरकार पाचपट अधिक भाव दिल्याचा दावा कसा करू शकते? असा सवाल पवार, विद्याताई वेखंडे यांनी केला. शहापूर तालुक्यातील ८५ टक्के शेतकऱ्यांच्या हरकती असतील, तर सात गावातील ३२३ शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शवल्याचा दावा फसवा असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पालगतच्या मेगासिटीमुळे शेतकरी भूमिहीन होउन शेती संपुष्टात येईल, याचा पुनरूच्चार बबन हरणे यांनी केला. आमदार पांडुरंग बरोरा यांनी तालुक्यातील या प्रकल्पाविरोधात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे जाहीर केले. जमीन खरेदीसाठी येणारा कोणताही दलाल अथवा ठेकेदाराच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन अपर्णा खाडे यांनी केले.