शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्टॅन यांच्या मृत्यूस जबाबदार यंत्रणेवर खटला दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

ठाणे : फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनाबाबत ठाण्यातील ख्रिस्ती बांधव आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांचे ...

ठाणे : फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनाबाबत ठाण्यातील ख्रिस्ती बांधव आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांचे वय पाहता त्यांच्याशी माणुसकीच्या नात्याने वागायला हवे होते, अशा भावना समाजबांधवांनी व्यक्त केल्या. तसेच, त्यांचा मृत्यू कोणामुळे झाला याचा पाठपुरावा होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे स्टॅन यांच्या खुनास जबाबदार यंत्रणेवर, खटला दाखल करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

बहुतेकांच्या मनामध्ये आज प्रश्न आहे की, फादर स्टॅनला कोणी मारले? या प्रश्नाचे उत्तर मिळणे आणि त्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत होणे आवश्यक आहे. मला वाटते. न्याय, सत्य, बंधुत्वावर आधारित असलेल्या संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या या देशात आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे. स्वामींचा मृत्यू व्यर्थ नाही. मला माहीत आहे त्यांच्या मृत्यूने एक नवीन जीवन आणि समाज जन्माला येईल. मी जरी लज्जितपणे डोके टेकवत असलो तरी मला माझ्या सहकारी बंधूचा अभिमान आहे.

- बिशप ऑलविन, प्रमुख, ठाणे डिनरी

------------------------

जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती दोषी नसतो. फादर स्टॅन स्वामी हे ज्येष्ठ नागरिक होते. त्यांचे वय पाहता सरकारने त्यांच्याशी माणुसकी या नात्याने वागायला हवे होते तसेच त्यांना वेळेत उपचार मिळायला हवे होते. या देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे की त्याला चांगले उपचार मिळावेत. परंतु, त्यांना याला पण मुकावे लागले ही खेदाची बाब आहे.

- कॅसबर ऑगस्टिन, माजी अध्यक्ष, बॉम्बे कॅथलिक सभा, ठाणे युनिट

------------------------------

सोमवारचा दिवस हा ख्रिश्चन समाजासाठी काळा दिवस ठरला. फादर स्टॅन स्वामी यांच्याबाबत जे घडले ते अत्यंत वाईट घडले. आम्हाला अतीव दुःख होत आहे. ते शेवटपर्यंत गरिबांसाठी झटत राहिले होते. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर न्याय मिळायला हवा.

- डेव्हिड सोरस, सदस्य, सेंट जॉन चर्च, ठाणे

----------------------

स्टॅन यांच्या खुनास जबाबदार यंत्रणेवर, खटला दाखल करा!

फादर स्टॅन स्वामी यांचे सोमवारी झालेले निधन हा नैसर्गिक मृत्यू नसून व्यवस्थेने त्यांचा केलेला हा निर्घृण खून आहे. या खुनाला जबाबदार जेल प्रशासनाचा निष्काळजीपणा, सरकारी यंत्रणांचा द्वेषपूर्ण तपास आणि एका वयोवृद्ध निरपराध नागरिकाला संविधानातील २१व्या कलमानुसार दिलेला जगण्याचा मूलभूत अधिकार नाकारला जात असतांनाही, न्याय यंत्रणेने त्याकडे केलेला कानाडोळा या बाबी आहेत. पार्किन्सनसारखा दुर्धर आजार व त्यात वर तब्येत प्रचंड खालावलेली असतांनाही स्वामी यांना वेळेवर योग्य उपचार देण्यात कुचराई करण्यात हात असलेल्या सर्व संबंधितांवर, कोठडीत आरोपीचा संगनमताने खून केल्याचा खटला दाखल करावा. तसेच कोरोना संकट लक्षात घेऊन, आरोप सिद्ध न झालेल्या बंदीवानांना त्वरीत जामिनावर सोडावे.

- डॅा. संजय मंगला गोपाळ, राष्ट्रीय समन्वयक, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयक