शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकराचा बोजा ४५ कोटींचा

By admin | Updated: January 24, 2017 05:51 IST

शहरातील ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात माफी, तर ७०० चौ. फुटांच्या घरांना करात सवलत देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेमुळे

सदानंद नाईक / उल्हासनगरशहरातील ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात माफी, तर ७०० चौ. फुटांच्या घरांना करात सवलत देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेमुळे महापालिकेच्या तिजोरीवर ४५ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.उल्हासनगर महापालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालमत्ताकरात माफी व सवलत देण्याची घोषणा केली. महापालिका क्षेत्रात २ लाख मालमत्ताधारक असून त्यापैकी ९० हजार मालमत्ता ५०० फुटांच्या आतील आहेत. त्यांच्याकडून वर्षाला ४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ताकर वसूल होत असल्याची माहिती करसंकलन विभागाने दिली. महापालिकेकडे मालमत्ताकर व एलबीटीचा शासन निधी हे दोन उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांच्या पगारासह इतर सुविधा पुरवण्यात येतात. निधीअभावी अनेक विकासकामे ठप्प पडली असून इतर विकासकामे खासदार, आमदार यांच्या निधीसह शासनाच्या अनुदानातून केली जात आहे. ३५० कोटींची मालमत्ताकर थकबाकी असून ती वसूल करण्यासाठी करवसुली विभागाचा पदभार दादा पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यांनी टप्प्याटप्प्याने सर्वच थकबाकीधारकांना नोटिसा पाठवून कर भरण्याचे आवाहन केले. तसेच २५० पेक्षा जास्त मालमत्तेला सील ठोकून त्यांचा लिलाव करण्याची घोषणा केली. यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येत असतानाच करमाफी व करसवलत दिल्यास पालिकेने मोठे नुकसान होणार आहे.महापालिकेला स्थानिक संस्था करातून महिन्याला १६ कोटींचे उत्पन्न मिळत होते. जकात बंद होऊन एलबीटीकर लागू झाला. तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी जकातीपेक्षा जास्त उत्पन्नाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप व पालिका अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे दरमहा सरासरी ८ कोटींपेक्षा जास्त एलबीटी वसूल झाली नाही. अपवाद केवळ तत्कालीन उपायुक्त प्रकाश कुकरेजा यांचा. त्यांनी एलबीटी उत्पन्न १३ कोटींवर नेले होते. वर्षाला १०० कोटी, तर एकूण २५० कोटींचे नुकसान एलबीटीमुळे झाले आहे. शासनानेही एलबीटीऐवजी दिलेला निधी अपुरा असल्याची मागणी होत आहे.