शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यावर होणार प्रक्रिया

By admin | Updated: May 23, 2017 01:34 IST

उल्हासनदीमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी जात असल्याने ती प्रदूषित होत आहे. बदलापूरमध्ये उल्हासनदी अधिक प्रदूषित होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : उल्हासनदीमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी जात असल्याने ती प्रदूषित होत आहे. बदलापूरमध्ये उल्हासनदी अधिक प्रदूषित होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’ अंतर्गत प्रसिद्ध झाले. याची नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दखल घेत सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सक्षमपणे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच जे लहानमोठे नाले थेट उल्हासनदीला मिळतात त्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. बदलापूरमधून वाहत जाणाऱ्या उल्हासनदीच्या सुरक्षेची जबाबदारी ही बदलापूरकरांची आहे. त्यामुळे आता होणारे उल्हासनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात येणार आहे. शहरातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाले असून ते सर्व सांडपाणी मलनिस:रण प्रकल्पात आल्यावर त्यावर योग्य प्रक्रिया केली जाते. मात्र शहरात असे काही नाले आहेत की जे थेट उल्हासनदीला जाऊन मिळतात. या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने काय करता येईल याचा आढावा घेतला जात आहे. नाल्यावरील पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यासाठी त्याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. भुयारी गटाराचे पाणी थेट उल्हासनदीत जात असल्याने त्याचे प्रदूषण हे आधी प्रचंड प्रमाणात होते. आता हे पाणी मलनिस्स:रण प्रकल्पात जात असल्याने काही प्रमाणात प्रदूषण कमी झाले आहे. जे मोठे नाले थेट नदीत जातात त्या पाण्याचे नियोजन करण्याचा विचार पालिका करत आहे. प्रदूषण कमी करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.